शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:13 IST

Amit Shah : राज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. 'आम्ही घटनादुरुस्ती केली, जीएसटी आणून जनहितासाठी काम केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शंभर वेगवेगळे कायदे रद्द केले. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी, मागास जातींच्या कल्याणासाठी घटना दुरुस्ती केली. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठी गरिबांच्या कल्याणासाठी तिसरी दुरुस्ती करण्यात आली, असे अमित शाह म्हणाले.

आम्ही घटना दुरुस्ती करुन कल्याणकारी योजना आणल्याते पुढे म्हणतात, आम्ही महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा आणला. ज्या दिवशी या सभागृहात 33 टक्के महिला शक्ती बसेल, त्या दिवशी संविधान निर्मात्यांची कल्पना साकार होईल. काँग्रेसने इतकी वर्षे व्होट बँकेचे राजकारण करून मुस्लिम भगिनींवर अन्याय केला. तिहेरी तलाक संपवून मुस्लिम माता-भगिनींना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आरिफ मोहम्मद खान मंत्री होते. शाहबानो यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, असे ते म्हणाले. यामुळे त्यांना मंत्रीपद आणि खासदारकीही गमवावी लागली. आम्ही नवीन शैक्षणिक धोरण आणले. शैक्षणिक धोरण येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या भारतीय न्यायसंहितेच्या माध्यमातून देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केले. 

संविधान दाखवण्याचा नाही, विश्वासाचा विषयराज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे. या निवडणुकीत एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. प्रचारसभांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हातात संविधान घेऊन दाखवले. संविधान फक्त हातात घेऊन दाखवण्याचा विषय नाही, तर त्यावर विश्वास ठेवण्याचा विषय आहे. संविधान दाखवून जनादेश घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान संविधानाच्या प्रत वाटल्या, पण त्या कोऱ्या होत्या, प्रस्तावनाही नव्हती. 75 वर्षांच्या इतिहासात राज्यघटनेच्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक कुणीच केली नाही. तुम्ही संविधानाची खोटी प्रत घेऊन फिरत आहात, हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोकांनी तुमचा पराभव केला, अशी घणाघाती टीकाही अमित शाहांनी केली.

आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्लाबोलअमित शाह पुढे म्हणतात, 5 नोव्हेंबर 1971 रोजी इंदिरा गांधींच्या सरकारने 24 व्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेला नागरी हक्क कमी करण्याचा अधिकार दिला. 39व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरूनही अमित शाहांनी काँग्रेसला धारेवर धरले. ही काय घटनादुरुस्ती होती? अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. यानंतर घटनादुरुस्तीद्वारे पंतप्रधानपदाच्या न्यायालयीन चौकशीवरही बंदी घातली गेली. एक राज्यकर्ता म्हणतो की, माझी चौकशी कोणी करू शकत नाही आणि आमचे पंतप्रधान म्हणतात की, मी देशाचा सेवक आहे. 

परिवर्तन हा जीवनाचा मंत्र आहे, तो संविधान सभेने मान्य केला आणि त्यासाठी घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली. संविधान बदलण्याची तरतूद घटनेतच कलम 368 नुसार आहे. राहुल गांधी भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप करतात. भाजपने 16 वर्षात 16 बदल केले, काँग्रेसनेही बदल केले. त्यांच्या बदलाचा उद्देश काय होता? आम्ही केलेले बदल आपली लोकशाही बळकट करण्यासाठी होते आणि त्यांचे बदल आपली सत्ता टिकवण्यासाठी होते. यातूनच पक्षाचे चारित्र्य दिसून येते, अशी टीकाही शाहांनी यावेळी केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस