शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

भाजपाध्यक्ष अमित शहा यांना शेतक-यांचे तिखट प्रश्न, उत्तर देता देता झाली दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 5:36 PM

जवळपास एक हजार शेतकरी अमित शहांकडे आपले प्रश्न घेऊन आले होते. पण फक्त पाच शेतक-यांनाच प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली होती

चेन्नई - भाजपाध्यक्ष अमित शहा सध्या हैदराबाद-कर्नाटकच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी काही शेतक-यांची भेट घेतली. मात्र शेतक-यांचे प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना उत्तर देता अमित शहांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळाली. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं अमित शहांना जमत नव्हतं. रविवारी 25 फेब्रुवारीला अमित शहांनी हुमनाबाद येथे शेतक-यांची भेट घेतली. जवळपास एक हजार शेतकरी अमित शहांकडे आपले प्रश्न घेऊन आले होते. पण फक्त पाच शेतक-यांनाच प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली होती. 

शेतक-यांच्या नेत्यांनी अमित शहा यांना शेतक-यांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून करण्यात येणा-या उपाययोजनांवर प्रश्न विचारले. शेतकरी नेता सिद्धरमप्पा यांनी अमित शहांना विचारलं की, 'तुमच्याकडे व्यवसायिकांचं 17,15,100 कोटींचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत. पण 12,60,000 कोटींचं शेतकरी कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. तुम्हाला सत्तेत आणण्यामध्ये फक्त व्यवसायिकांची नाही तर शेतक-यांचीही मते होती हे लक्षात असू दे'. 

या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहांनी सांगितलं की, 'केंद्र सरकारने कोणत्याही व्यवसायिकाचं कर्ज माफ केलेलं नाही'. पुढे ते बोलले की, 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच मोदी सरकारने व्यवसायिकांचं कर्ज माफ केल्याचं म्हणत असतात. पण आम्ही कोणाचंही कर्ज माफ केलेलं नाही, फक्त टॅक्सचे दर कमी केले आहेत'. मात्र यावेळी त्यांनी शेतक-यांनी बँकांकडून घेतलेलं कर्ज माफ केलं जाणार की नाही याबद्दल सांगितलं नाही. 

भाजपाने स्वामीनाथन रिपोर्ट लागू करण्यासाठी सांगितलं होतं, तर मग युटर्न का घेतला ? असा प्रश्न विचारला असता अमित शहांनी उत्तर दिलं की, 'रिपोर्टमधील प्रमुख शिफारशी स्विकारण्यात आल्या असून त्यादृष्टीने काम सुरु आहे'. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह