शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:37 IST

आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

नवी दिल्ली -पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अमित शाहंपासून (Amit Shah) ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वच नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि भाजप थेट आमनेसामने आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, खरे तर असदुद्दीन ओवेसी बंगालमद्ये येत नाहीत, तर त्यांना भाजपच येथे घेऊन येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी सातत्याने करत आहेत. आता याला भाजप नेते अमित शाह यांनी स्वतःच उत्तर दिले आहे. (Amit Shah on aimim asaduddin owaisi in west bengal election)

याच मुद्द्यावर एका वृत्त संस्थेशी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. देशाच्या संविधानात प्रत्येक राजकीय पक्षाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. मग मते देणे अथवा न देणे हा जनतेचा अधिकार आहे.'

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा -अमित शाह यांनी बंगालच्या निवडणुकीत 200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी युती संदर्भातील एका प्रश्नावर शाह म्हणाले, 'सर्वच पक्ष स्वतत्र आहेत. त्यांना आपली युती कुणासोबत करायची, निवडणूक कशी लढायची, हे बघायचे आहे. आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

पश्चिम बंगालमध्ये भाजप ममतांना थेट टक्क देत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि डावे एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्ताधारी टीएमसीचा खरा सामना भाजप आणि काँग्रेस-डाव्या आघाडीशी आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात. यासाठी सर्वच पक्ष सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत.

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम' - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा