शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:37 IST

आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

नवी दिल्ली -पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अमित शाहंपासून (Amit Shah) ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वच नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि भाजप थेट आमनेसामने आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, खरे तर असदुद्दीन ओवेसी बंगालमद्ये येत नाहीत, तर त्यांना भाजपच येथे घेऊन येत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी सातत्याने करत आहेत. आता याला भाजप नेते अमित शाह यांनी स्वतःच उत्तर दिले आहे. (Amit Shah on aimim asaduddin owaisi in west bengal election)

याच मुद्द्यावर एका वृत्त संस्थेशी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. देशाच्या संविधानात प्रत्येक राजकीय पक्षाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. मग मते देणे अथवा न देणे हा जनतेचा अधिकार आहे.'

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा -अमित शाह यांनी बंगालच्या निवडणुकीत 200हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी युती संदर्भातील एका प्रश्नावर शाह म्हणाले, 'सर्वच पक्ष स्वतत्र आहेत. त्यांना आपली युती कुणासोबत करायची, निवडणूक कशी लढायची, हे बघायचे आहे. आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.'

पश्चिम बंगालमध्ये भाजप ममतांना थेट टक्क देत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि डावे एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्ताधारी टीएमसीचा खरा सामना भाजप आणि काँग्रेस-डाव्या आघाडीशी आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात. यासाठी सर्वच पक्ष सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत.

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम' - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा