शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:56 IST

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन काँग्रेसला टार्गेट केलं आहे. काश्मीरचा इतिहास तोडून-मोडून देशासमोर ठेवला गेला. कारण ज्या लोकांची चुकी होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास आणि वास्तव लोकांसमोर मांडला जाईल. 

माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. त्यावेळी त्यांनी कलम ३७० हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सुरुवातीपासून कलम ३७० हटविण्याचं अभियान सुरु केलं होतं. हा राजकीय निर्णय असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही शहांनी उत्तर दिलं. भाजपा जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासून एक देश, एक संविधान याची चर्चा करते. काश्मिरींवर गोळी चालणार नाही असं आश्वासनंही दिलं. 

कलम ३७० हटविण्यासाठी भाजपा आणि अन्य पक्ष खूप वर्षापासून संघर्ष करत होते. आम्ही फक्त बोलत नाही तर वारंवार यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत कलम ३७० हटविला नाही तोवर वेगवेगळे ११ आंदोलन करण्यात आले. जे आमच्यावर आरोप लावतात की, राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला त्यांना स्पष्ट करतो की, जेव्हा आमची पार्टी उदयास आली तेव्हापासून आमचं उद्दिष्ट कलम ३७० हटविणे हे होतं असं अमित शहांनी सांगितले. 

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. तेव्हा ठरलं होतं की, भारत ६३१ खंडामध्ये विभागला जाईल. त्यावेळी ब्रिटन संसदेत एक प्रस्ताव पास झाला असता तर ६३० संस्थानं भारतात विलीन झाली असती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रयत्न केले गोले नाही. विचार-विनिमय केला नाही, चर्चा घडली नाही असं अमित शहांनी सांगितले. 

तसेच ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते त्यावेळी युद्धविराम का दिलं गेले? त्यावेळी युद्ध थांबविण्याची काय गरज होती. यूएनमध्ये जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा वैयक्तिक होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर