शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:56 IST

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन काँग्रेसला टार्गेट केलं आहे. काश्मीरचा इतिहास तोडून-मोडून देशासमोर ठेवला गेला. कारण ज्या लोकांची चुकी होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास आणि वास्तव लोकांसमोर मांडला जाईल. 

माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. त्यावेळी त्यांनी कलम ३७० हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सुरुवातीपासून कलम ३७० हटविण्याचं अभियान सुरु केलं होतं. हा राजकीय निर्णय असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही शहांनी उत्तर दिलं. भाजपा जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासून एक देश, एक संविधान याची चर्चा करते. काश्मिरींवर गोळी चालणार नाही असं आश्वासनंही दिलं. 

कलम ३७० हटविण्यासाठी भाजपा आणि अन्य पक्ष खूप वर्षापासून संघर्ष करत होते. आम्ही फक्त बोलत नाही तर वारंवार यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत कलम ३७० हटविला नाही तोवर वेगवेगळे ११ आंदोलन करण्यात आले. जे आमच्यावर आरोप लावतात की, राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला त्यांना स्पष्ट करतो की, जेव्हा आमची पार्टी उदयास आली तेव्हापासून आमचं उद्दिष्ट कलम ३७० हटविणे हे होतं असं अमित शहांनी सांगितले. 

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. तेव्हा ठरलं होतं की, भारत ६३१ खंडामध्ये विभागला जाईल. त्यावेळी ब्रिटन संसदेत एक प्रस्ताव पास झाला असता तर ६३० संस्थानं भारतात विलीन झाली असती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रयत्न केले गोले नाही. विचार-विनिमय केला नाही, चर्चा घडली नाही असं अमित शहांनी सांगितले. 

तसेच ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते त्यावेळी युद्धविराम का दिलं गेले? त्यावेळी युद्ध थांबविण्याची काय गरज होती. यूएनमध्ये जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा वैयक्तिक होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर