शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 16:56 IST

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन काँग्रेसला टार्गेट केलं आहे. काश्मीरचा इतिहास तोडून-मोडून देशासमोर ठेवला गेला. कारण ज्या लोकांची चुकी होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास आणि वास्तव लोकांसमोर मांडला जाईल. 

माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. त्यावेळी त्यांनी कलम ३७० हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सुरुवातीपासून कलम ३७० हटविण्याचं अभियान सुरु केलं होतं. हा राजकीय निर्णय असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही शहांनी उत्तर दिलं. भाजपा जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासून एक देश, एक संविधान याची चर्चा करते. काश्मिरींवर गोळी चालणार नाही असं आश्वासनंही दिलं. 

कलम ३७० हटविण्यासाठी भाजपा आणि अन्य पक्ष खूप वर्षापासून संघर्ष करत होते. आम्ही फक्त बोलत नाही तर वारंवार यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत कलम ३७० हटविला नाही तोवर वेगवेगळे ११ आंदोलन करण्यात आले. जे आमच्यावर आरोप लावतात की, राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला त्यांना स्पष्ट करतो की, जेव्हा आमची पार्टी उदयास आली तेव्हापासून आमचं उद्दिष्ट कलम ३७० हटविणे हे होतं असं अमित शहांनी सांगितले. 

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. तेव्हा ठरलं होतं की, भारत ६३१ खंडामध्ये विभागला जाईल. त्यावेळी ब्रिटन संसदेत एक प्रस्ताव पास झाला असता तर ६३० संस्थानं भारतात विलीन झाली असती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रयत्न केले गोले नाही. विचार-विनिमय केला नाही, चर्चा घडली नाही असं अमित शहांनी सांगितले. 

तसेच ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते त्यावेळी युद्धविराम का दिलं गेले? त्यावेळी युद्ध थांबविण्याची काय गरज होती. यूएनमध्ये जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा वैयक्तिक होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूJammu Kashmirजम्मू-काश्मीर