शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:55 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. अमेठीला सिंगापूर बनवू असा वारंवार दावा करणाऱ्या राहुल गांधींना स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. अमेठी सिंगापूर बनली का? असा सवाल त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.  राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, आज नामांकन दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मोठा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी, भाओजी रॉबर्ट वाड्रा आणि भाचा रिहान आणि भाची मिराया हेसुद्धा उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना आव्हान देणाऱ्या  स्मृती इराणी या गुरुवारी आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ''राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अमेठीमध्ये विकास कामे झाली आहेत. इथे जो काही विकास झाला आहे तो भाजपामुळे झाला आहे.''असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. आपण अमेठी सोडून जाणार नाही. येथील जनतेची लढाई त्यांच्यासोबत राहूनच लढू असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला.  राहुल गांधी हे 2004 मध्ये प्रथमच अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासून ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी सहजपणे विजय मिळवला होता. मात्र 2014 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा