शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिर्रर्र...! बैलगाडा शर्यतीसंदर्भातील महाराष्ट्राचा सुधारित कायदा वैध; १२ वर्षांच्या लढ्याला मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 06:52 IST

२०११मध्ये बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश झाल्याने महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.

नवी दिल्ली : आता राज्यभर भिर्रर्र म्हणताच ढवळ्या-पवळ्या, सर्जा-राजाच्या जोड्या बैलगाडा शर्यतीत कायदेशीर अडथळ्याविना सुसाट वेगाने धावू शकणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक सरकारने अनुक्रमे बैलगाडा शर्यत, जल्लीकट्टू, कम्बाला यासंदर्भात केलेले सुधारित कायदे वैध आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. 

२०११मध्ये बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश झाल्याने महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून तेव्हापासून सुरू झालेला बारा वर्षांचा कायदेशीर लढा आता यशस्वी झाला आहे. न्या. के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निकाल दिला आहे. 

२०१७ : महाराष्ट्राने केला सुधारित कायदा- तामिळनाडूतील जल्लीकट्टूप्रेमींनी जानेवारी २०१७मध्ये खूप मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे तामिळनाडू सरकारने सुधारित कायदा करून जल्लीकट्टू खेळाला परवानगी दिली होती. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही बैलगाडा शर्यतींबाबत २०१७ साली सुधारित कायदा केला. 

- मात्र प्राणिमित्रांनी नव्या कायद्यालाही उच्च न्यायालयात विरोध केला होता. याप्रकरणी अखेर महाराष्ट्र सरकारने २०१८ साली सर्वोच्च न्यायालयात अपील केले. हे प्रकरण नंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आले होते.

असा दिला महाराष्ट्राने कायदेशीर लढा... -बैलगाड्यांवरील शर्यतीवर बंदी हटविण्यासाठी २०१२ साली बैलगाडा चालक-मालक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे या संघटनेने फेब्रुवारी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये महाराष्ट्र सरकारने काही नियम व अटींसह नवे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवल्यानंतर काही नियम व अटींसह शर्यती सुरू करण्याला न्यायालयाने परवानगीही दिली होती. बैलांचा छळ होत असल्याचे; तसेच बैलाचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश झाल्याचे प्राणिमित्रांनी सर्वोच्च न्यायालयाला मे २०१४च्या सुनावणीत निदर्शनास आणून दिले. त्यानंतर देशातील बैलांच्या सर्वच खेळांवर बंदी आणण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता.

बैलगाडा चालक-मालकांनी केले होते राज्यव्यापी आंदोलनबैलगाडा चालक-मालक संघटनेने ऑगस्ट २०२१मध्ये बैलगाडा चालक-मालक व बैलगाडा शर्यतप्रेमींनी राज्यभर आंदोलन केले होते. त्यानंतर १६ डिसेंबर २०२१मध्ये महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती.

बैलगाडा शर्यतीबाबत कायदा आणि शास्त्रीय समितीने बैल हा धावणारा प्राणी आहे, असा अहवाल दिला हाेता.  ताे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा हा विजय आहे.    - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयState Governmentराज्य सरकार