शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अ‍ॅम्बी व्हॅली बे‘सहारा’

By admin | Updated: February 7, 2017 05:56 IST

सहारा ग्रुपचा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प जप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला

नवी दिल्ली : सहारा ग्रुपचा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प जप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे १४ हजार ७७९ कोटी रुपये उभे करणे सहारा ग्रुप आणि सुब्रतो रॉय यांना भाग पडावे, यासाठी हा आदेश आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्या. दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला. ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ हा प्रकल्प सहारा ग्रुपने विकसित केलेला आहे. कोणतेही कर्ज नसलेल्या मालमत्तांची यादी २० फेब्रुवारीपर्यंत देण्यासही न्यायालयाने सहारा ग्रुपला सांगितले आहे. त्यामुळे या मालमत्तेचा सार्वजनिक लिलाव करण्याचा निर्णय त्याला घेता येईल. जे पैसे देणे आहेत, ते या लिलावातून उभे केले जातील. सध्याची टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची पद्धत खंडपीठाला मान्य नाही. सहाराने आतापर्यंत केवळ ११ हजार कोटी रुपयेच दिले असून, उरलेले १४ हजार ७७९ कोटी रुपये सेबीकडे भरण्यासाठी जुलै २०१९ पर्यंतचा वेळ मागून घेतला आहे. सहाराने सेबीकडे सोमवारी फक्त ६०० कोटी रुपये जमा केले. पैसे भरण्याची मुदत जुलै २०१९ पर्यंत लांबवणे खूपच लांबत जात असून, थकलेले पैसे उभे करण्यासाठी मालमत्तांचा लिलाव व्हावा, असे न्यायालयाला वाटते. यापुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. ‘अ‍ॅम्बी व्हॅली’ची जाहीर झालेली किंमत ३९ हजार कोटी रुपये आहे. सिब्बल म्हणाले, ‘जप्तीची घाई कशासाठी?’सहारा ग्रुपचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला मालमत्ता जप्तीचा आदेश देऊ नका, अशी विनंती केली होती. जप्तीची घाई कशासाठी? बँक पैशाची मागणी करीत नाही. कोणत्याही गुंतवणूकदाराने पैसे मागितलेले नाहीत, असे सिब्बल म्हणाले. कंपनीने आधीच ८५ टक्के गुंतवणूकदारांचे देणे अदा केले असल्याचा दावा करणारा, प्राप्तिकर अपिलेट लवादाचा आदेशही या वेळी अ‍ॅड. सिब्बल यांनी दाखवला. सहाराने काही दप्तर (रेकॉर्ड) सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. सिब्बल यांनी लवादाने आवश्यक ती खातरजमा केल्यानंतरच निवाडा दिला आहे, असे म्हटले. गुंतवणूकदारांकडून दोन आर्थिक योजनांद्वारे (सेबीने या दोन्ही आर्थिक योजना बेकायदा असल्याचे जाहीर केले होते) जमवलेले पैसे परत करण्यास, सहाराला ३१ आॅगस्ट २०१२ रोजी दिल्या गेलेल्या आदेशाबाबत अ‍ॅड. सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु खंडपीठाचे यामुळे समाधान झाले नाही. खंडपीठ म्हणाले की, ‘आम्ही त्या आदेशावर फेरविचार करणार नाही. तुमच्याविरोधात न्यायालयीन निष्कर्ष आहेत आणि आम्ही येथे आदेशाचा फेरविचार करण्यासाठी नाही आहोत.’ सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मिळालेला पॅरोल सध्या कायम राहील. न्यायालयाने आदेश देऊनही सुब्रतो रॉय न्यायालयात हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०१४ मध्ये त्यांना तुरुंगात पाठवले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात रॉय यांच्या आईचे निधन झाल्यावर रॉय यांना पॅरोल मंजूर झाला होता. रॉय यांना तुरुंगात पुन्हा जायची वेळ येऊ नये, म्हणून कंपनी सेबीकडे पैसे भरत आहे.