शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
5
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
6
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
7
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
8
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
9
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
10
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
11
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
12
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
13
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
14
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
15
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
16
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
17
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
18
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
19
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
20
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

अमरनाथ यात्रा संपन्न, 2.60 लाख भाविकांनी घेतले दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 11:57 AM

काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे.

श्रीनगर, दि. 8 - काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. तर 2016 वर्षात 2 लाख 20 हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले होते.  दरम्यान, या वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 60 भाविकांचा मृत्यू झाला आहे. 

अमरनाथ यात्रा 29 जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गाहून सुरू झाली होती.  बहुतांश भाविकांनी 45 किलोमीटर लांब असलेल्या पारंपरिक पहलगाम चंदनवाडी मार्गाऐवजी 16 किलोमीटर असलेल्या बालटाल मार्गाहून ही यात्रा पूर्ण केली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार अधिका-यांकडून यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सावधगिरी बाळगण्यात आली. या यात्रेत नोंदणीकृत भाविकांशिवाय अन्य कुणालाही सहभागी होऊ देण्यात आले नाही.

प्रशासनाकडून विशेष काळजीभाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली होती. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्‍वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आले होते. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण दिले गेले होते.

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्लादरम्यान 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. 

कसा झाला हल्ला ?मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता