शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नवज्योत सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अमरिंदर सिंग यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:20 IST

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो

ठळक मुद्देराज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. राज्यात निवडणूक होणार असल्यामुळे सिद्धू हे मला, पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना मान्य नाहीत, असे सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे समजते.

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो आणि राज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील आजच्या परिस्थितीचा विचार करता पुढील सरकार शिरोमणी अकाली दलाने स्थापन केल्यास कोणाला धक्का बसण्याचे कारण नाही, अशा काळजीत काँग्रेसजन आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, “कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सरकार आधीच मतदारांच्या नाराजीला तोंड देत आहे आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना किमान दीड वर्षांपूर्वी पदावरून दूर करायला हवे होते.

फसल ये काट रहे हैn“हमने जमीन बनाई और ये फसल काट रहे है” असे या निंदकांचे म्हणणे आहे. अमरिंदर सिंग यांच्या विरोधकांचे म्हणणे असे की, “अमरिंदर सिंग यांना पक्षाने निवडणूक जिंकली तर आपण मुख्यमंत्री बनणार नाही हे माहीत असल्यामुळे ते काँग्रेसचा निवडणुकीत पराभव निश्चित करतील.” nनवज्योत सिंग सिद्धू यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केले जावे, असे आम्ही केंद्रीय नेतृत्वाला आधीच सांगितले आहे आणि ते पुरेसे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस