शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:20 IST

केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर येताच दोन दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यांना भेटून १७ सप्टेंबरला केजरीवाल राजीनामा देऊ शकतात. केजरीवालांनी याचबरोबर लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यामुळे असे झाले तर महाराष्ट्रासोबतच दिल्लीत निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी राज्यात महाराष्ट्रासोबत निवडणुका घ्याव्यात. केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. 

केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात असले तरी आपने मुदतपूर्व निवडणुकीचा पर्याय खुला ठेवला आहे. आपचे विधानसभेत बहुमत आहे, यामुळे उपराज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलवतील, असा अंदाज भारद्वाज यांनी व्यक्त केला आहे. परंतू, असे न झाल्यास दिल्लीत निवडणूक लावायची की नाही याचा चेंडू आता भाजपाच्या कोर्टात असल्याचे ते म्हणाले. 

केजरीवालांना नेमके काय हवेय, त्यांनी कोणती खेळी खेळली आहे, हे अद्याप भाजपाच्या लक्षात आले असावे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या निवडणुका आहेत. तिथे भाजपातील नाराज नेते आपकडे वळले आहेत. हरियाणात भाजपाचे पानिपत होणार असे चर्चिले जात आहे. महाराष्ट्रातही भाजपसाठी चांगले वातावरण नाही. याचा फायदा केजरीवालांना दिल्लीत होऊ शकतो. जोपर्यंत जनता सांगणार नाही तोपर्यंत मी सत्तेच्या या खुर्चीवर बसणार नाही, अशी भूमिका केजरीवालांनी घेतली आहे. यामुळे अबकारी घोटाळा प्रकरणातील अटक केजरीवाल भाजपविरोधी लाटेत चांगल्याप्रकारे वापरून घेणार आहेत. 

महाराष्ट्रासोबत निवडणूक शक्य?लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 15 नुसार निवडणूक आयोग विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या दोन्ही राज्यात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होऊ शकतात. परंतू, जर यात राजकारण आड आले तर केजरीवालांचा नोव्हेंबरमधील निवडणूक घेण्याचा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो. आयोग या निवडणुका फेब्रुवारी, मार्चमध्ये पण घेऊ शकतो.  

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४