शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:20 IST

केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर येताच दोन दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यांना भेटून १७ सप्टेंबरला केजरीवाल राजीनामा देऊ शकतात. केजरीवालांनी याचबरोबर लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यामुळे असे झाले तर महाराष्ट्रासोबतच दिल्लीत निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी राज्यात महाराष्ट्रासोबत निवडणुका घ्याव्यात. केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. 

केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात असले तरी आपने मुदतपूर्व निवडणुकीचा पर्याय खुला ठेवला आहे. आपचे विधानसभेत बहुमत आहे, यामुळे उपराज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलवतील, असा अंदाज भारद्वाज यांनी व्यक्त केला आहे. परंतू, असे न झाल्यास दिल्लीत निवडणूक लावायची की नाही याचा चेंडू आता भाजपाच्या कोर्टात असल्याचे ते म्हणाले. 

केजरीवालांना नेमके काय हवेय, त्यांनी कोणती खेळी खेळली आहे, हे अद्याप भाजपाच्या लक्षात आले असावे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या निवडणुका आहेत. तिथे भाजपातील नाराज नेते आपकडे वळले आहेत. हरियाणात भाजपाचे पानिपत होणार असे चर्चिले जात आहे. महाराष्ट्रातही भाजपसाठी चांगले वातावरण नाही. याचा फायदा केजरीवालांना दिल्लीत होऊ शकतो. जोपर्यंत जनता सांगणार नाही तोपर्यंत मी सत्तेच्या या खुर्चीवर बसणार नाही, अशी भूमिका केजरीवालांनी घेतली आहे. यामुळे अबकारी घोटाळा प्रकरणातील अटक केजरीवाल भाजपविरोधी लाटेत चांगल्याप्रकारे वापरून घेणार आहेत. 

महाराष्ट्रासोबत निवडणूक शक्य?लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 15 नुसार निवडणूक आयोग विधानसभेची मुदत संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या दोन्ही राज्यात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होऊ शकतात. परंतू, जर यात राजकारण आड आले तर केजरीवालांचा नोव्हेंबरमधील निवडणूक घेण्याचा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो. आयोग या निवडणुका फेब्रुवारी, मार्चमध्ये पण घेऊ शकतो.  

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४