शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा, पण सेनेला नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 18:37 IST

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा

नवी दिल्ली - सरकारमध्ये एकत्र  असूनही भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. मात्र युती झाल्यास त्याचा फायदा भाजपालाच  अधिक होईल, तर सेनेचे मात्र नुकसान होईल, असेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्रातील मोदी सरकारला 26 मे रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबरोबरच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, विविध संस्थांमार्फत जनमताच्या कलाचे सर्व्हेही प्रसिद्ध होऊ लागले आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास या युतीला 48 टक्के मते मिळतील. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 40 टक्के मते मिळतील. 2014 च्या तुलनेत युतीच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे. मात्र आघाडीच्या मतांमध्ये 5 टक्क्यांनी घसघशीत वाढ होऊ शकते. मात्र या सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात युती झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेपेक्षा भाजपालाच अधिक होताना दिसत आहे. युती झाल्यास भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत दोन टक्क्यांनी वाढ होऊन भाजपाला 29 टक्के मिळतील, दुसरीकडे युती झाल्यानंतरही शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गतवेळच्या 24 टक्क्यांवरून शिवसेनेची मतांची टक्केवारी 19 टक्क्यांवर घसरण्याचा अंदाज आहे.   

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण