शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

परिस्थिती हाता बाहेर, हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा...; योगी सरकारला HC नं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:58 PM

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता आणि आवश्यक औषधींचा आभाव, यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Uttar pradesh)

लखनौ - उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थितीवरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) योगी आदित्यनाथ (yogi adityanath) सरकारला फटकारले आहे. यावेळी, यूपी पंचायत निवडणुकीत कोरोना गाइडलाइनचे पालन का गेले गेले नाही? असा सवालही न्यायालयाने केला आहे. याच बरोबर, न्यायालयाने योगी सरकारला 'हात जोडून', राज्यातील मोठ्या शहरांत 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लावण्यात यावा, असा सल्लाही पुन्हा एकदा दिला आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने राज्यातील पाच मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो मानण्यास सरकारने नकार दिला होता. (UP Allahabad high court judge said with folded hands to yogi adityanath government to impose lockdown)

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित -उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता आणि आवश्यक औषधींचा आभाव, यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लक्षात घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राज्यातील योगी सरकारला जबरदस्त फटकारले. राज्यातील स्थिती नियंत्रणा बाहेर गेल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. डॉक्टर्सची कमतरता आहे. ऑक्सिजन नाही, एल-1, एल-2 हॉस्पिटल नाहीत. कागदांवर सर्वकाही छान आहे. मात्र, प्रत्यक्षात सुविधांचा आभाव आहे. हे कुणापासूनही लपून नाही.

कोरोनाशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करताना जस्टिस सिद्धार्थ वर्मा पुढे म्हणाले, आम्ही आपल्याला (योगी सरकारला) हात जोडून, आपल्या विवेकाचा वापर करण्याची विनंती करतो. न्याधिशांनी म्हटले आहे, की राज्यातील स्थिती नियंत्रणात नसेल, तर दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यात उशीर करू नका. याआधीही न्यायालयाने राज्य सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला होता.

CoronaVirus: भाजप तयार करतेय जम्बो आयसोलेशन सेंटर, मिळणार मोफत उपचार; दाखवलं जाणार रामायण अन् बरंच काही

135 शिक्षकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? -कोरोनाच्या बिकट परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये ड्युटीवर असणाऱ्या 135 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारत, या शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? निवडणूक घेताना कोरोना नियमांचे पालन का केले नाही? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये? अशा प्रश्नांची तोफ डागली आहे. या निवडणुकीत हजारो शिक्षक, शिक्षक मित्र आणि अनुदेशकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

जनतेच्या आरोग्याच्या अडचणी सोडवणे सरकारचे काम आहे. ते केले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यावर सरकार निवडणूक कामांमध्ये व्यस्त झाले. तेव्हाच उपाययोजना वाढवणे गरजेचे होते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने योगी सरकारची कानउघडणी केली आहे.

CoronaVirus : आता 'या' राज्यात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, सरकारचा मोठा निर्णय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथCourtन्यायालय