शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अरेरे! "हॅलो पप्पा, सासरी वीज नाही... प्लीझ माहेरी बोलावून घ्या"; लग्नानंतर 4 नववधू झाल्या हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 16:59 IST

सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न म्हटलं की विविध किस्से हे आले. लग्नातील भन्नाट गोष्टी, हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सासरी वीज नाही म्हणून चार नववधुंनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे. जवळपास 20 दिवसांपासून घरामध्ये वीज नसल्यामुळे हैराण झालेल्या चार नववधू आपल्या माहेरी गेल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या यमुनापारच्या घूरपूर येथील भीटा वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इरादतगंज गावात ही अजब घटना घडली आहे. दोन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 17 मे रोजी 25 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता. गावकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर 22 मे रोजी तक्रार दाखल केली. पण ठरलेल्या वेळेत नवा ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नाही. गावकरी सतत ट्रान्सफॉर्मर बदलण्याची विनंती करीत होते. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला नव्हता. 

इरादतगंज गावात वीज ठप्प झाल्यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. मात्र सर्वाधित त्रास नववधुंना होत होता. 20 दिवसांपूर्वी या गावात लग्न करून आलेल्या 2 जणींनी माहेरी फोन करून नातेवाईकांना बोलावलं तर 8 दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या दोन तरुणींनाही सहन झालं नाही आणि त्यांनी वीज नसल्याने वडिलांना बोलावलं आणि त्या माहेरी निघून गेल्या आहेत. 

लग्नानंतर काही दिवस तरुणी सासरी राहत होत्या. त्याच्या काही दिवसांनंतर नववधू काही दिवसांसाठी माहेरी जाते. मात्र वीज नसल्याने त्या त्रस्त झाल्या. उकाड्यामुळे हैराण झाल्या. नवरी सासरी आल्यानंतर अनेक विधी केले जातात. मात्र वीज नसल्यामुळे कोणतेच विधी होऊ शकले नाही. विधी होण्याच्या आधीच गावातील चार नववधू माहेरी परतल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले आहेत. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीजmarriageलग्न