शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

"अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती’’, विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:25 IST

Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. 

मालवणजवळ राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

या संदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे. बदलापूर प्रकरण अपघात होता. समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता. नांदेड मधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली अपघात होता. ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता. महाराष्ट्रभर ड्रग्स चा सुळसुळाट सुरू आहे तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता.रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी,  मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी या तिघांची जी धडपड सुरू आहे त्यामुळेच हे सगळे अपघात घडताहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार