शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

ईशान्य भारतामधील सर्व राज्ये रेल्वेने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:18 IST

ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशात ७९५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे.अरुणाचल प्रदेशातील रेल्वेसेवेमुळे सीमेपाशी राहणाऱ्या भारतीयांचा प्रवास सोपा होईल, लष्कराला साधनसामग्रीची वाहतूक करणेही शक्य होईल. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील बोगीबील पूल लवकरच खुला होणार असून, त्यामुळे या दोन राज्यांतील रेल्वेसेवाही शक्य होईल. सध्या आसाम, त्रिपुरा व अरुणाच प्रदेशचा अगदी लहान भाग रेल्वेने जोडला गेला आहे. मात्र अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरसह मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम व नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेलेल्या नाहीत. भैराबी व सायरंग या ५१ किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐझवालला जोडली जाईल. सायरंग हे ऐझवालपासून १८ किमीवर आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सिक्किममध्ये सुरु आहे. ते पूर्ण होण्याआधी पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आल्याने तेथील लोकांना विमान व रेल्वेसेवा मिळणार आहेत.