शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

ईशान्य भारतामधील सर्व राज्ये रेल्वेने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:18 IST

ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशात ७९५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे.अरुणाचल प्रदेशातील रेल्वेसेवेमुळे सीमेपाशी राहणाऱ्या भारतीयांचा प्रवास सोपा होईल, लष्कराला साधनसामग्रीची वाहतूक करणेही शक्य होईल. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील बोगीबील पूल लवकरच खुला होणार असून, त्यामुळे या दोन राज्यांतील रेल्वेसेवाही शक्य होईल. सध्या आसाम, त्रिपुरा व अरुणाच प्रदेशचा अगदी लहान भाग रेल्वेने जोडला गेला आहे. मात्र अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरसह मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम व नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेलेल्या नाहीत. भैराबी व सायरंग या ५१ किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐझवालला जोडली जाईल. सायरंग हे ऐझवालपासून १८ किमीवर आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सिक्किममध्ये सुरु आहे. ते पूर्ण होण्याआधी पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आल्याने तेथील लोकांना विमान व रेल्वेसेवा मिळणार आहेत.