शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ईशान्य भारतामधील सर्व राज्ये रेल्वेने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:18 IST

ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या दोन वर्षांत रेल्वेसेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी सुमारे ९0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यात अरुणाचल प्रदेशात ७९५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे.अरुणाचल प्रदेशातील रेल्वेसेवेमुळे सीमेपाशी राहणाऱ्या भारतीयांचा प्रवास सोपा होईल, लष्कराला साधनसामग्रीची वाहतूक करणेही शक्य होईल. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील बोगीबील पूल लवकरच खुला होणार असून, त्यामुळे या दोन राज्यांतील रेल्वेसेवाही शक्य होईल. सध्या आसाम, त्रिपुरा व अरुणाच प्रदेशचा अगदी लहान भाग रेल्वेने जोडला गेला आहे. मात्र अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरसह मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम व नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेलेल्या नाहीत. भैराबी व सायरंग या ५१ किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐझवालला जोडली जाईल. सायरंग हे ऐझवालपासून १८ किमीवर आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सिक्किममध्ये सुरु आहे. ते पूर्ण होण्याआधी पाक्योंग येथे विमानतळ बांधण्यात आल्याने तेथील लोकांना विमान व रेल्वेसेवा मिळणार आहेत.