शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Jammu And Kashmir : काश्मिरात उद्यापासून सुरू होणार पोस्टपेड मोबाईल सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:01 AM

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोमवार दुपारपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. गेल्या 69 दिवसांपासून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आलेली आहे.  इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी मात्र नागरिकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. सोमवार (14 ऑक्टोबर) दुपारपासून काश्मीर खोऱ्यातील सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने याची घोषणा केली आहे. गेल्या 69 दिवसांपासून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा बंद करण्यात आलेली आहे.  

कलम 370 घटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. सरकारचे प्रवक्ते आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी रोहित कन्साल यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी दुपारी पोस्टपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. वास्तविक शनिवारीच ही सेवा पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. 

इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी मात्र नागरिकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सात दक्षलक्ष नागरिकांना गैरसोय सोसावी लागत आहेत. त्यावरून राज्याच्या प्रशासनावर टीकाही होत आहे. प्रशासनाही याबाबतीत अनेक पर्यायांवर विचार करत आहे. काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले होते. आता काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हळुहळू सामान्य होत असून, काश्मीरमधील राज्य प्रशासनाने पर्यटकांना काश्मीरमध्ये न जाण्यासंदर्भात जारी केलेली सिक्यॉरिटी अ‍ॅडव्हायजरी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबरपासून ही अ‍ॅडव्हायजरी मागे घेण्यात येणार असून, त्यानंतर पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात जाण्याची परवानगी मिळणार आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी  तीन दिवस आधी 2 ऑगस्ट रोजी  एक सिक्यॉरिटी अ‍ॅडव्हायजरी जारी करून पर्यटकांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यकांना शक्य होईल तितक्या लवकर काश्मीर खोरे सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहविभागाकडून काश्मीर खोऱ्यामध्ये जाण्यासाठी जारी करण्यात आलेली ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 10 ऑक्टोबरपासून लागू होईल. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMobileमोबाइलArticle 370कलम 370