शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:13 IST

'मत चोरी'सारख्या शब्दांचा वापर पूर्णपणे चुकीचा आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर दुसरे काय आहे?'

नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मत चोरी' आणि बिहारमधील SIR वरुन केलेल्या आरोपांबाबत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी(दि. १७) महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच, "निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान आहेत. आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही. आमचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच सर्वांसाठी खुले असतात," असे स्पष्ट केले.

सर्व पक्ष आमच्यासाठी समानज्ञानेश कुमार पुढे म्हणतात, "तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, कायद्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म निवडणूक आयोगात नोंदणीद्वारे होतो. मग निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करू शकतो? निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत. कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी, निवडणूक आयोग आपल्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. 'मत चोरी'सारख्या शब्दांचा वापर पूर्णपणे चुकीचा आहे. असे चुकीचे शब्द वापरुन जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला, तर हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर दुसरे काय आहे? अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल करायला हवी होती."

हा संविधानाचा अपमान"काही पक्ष आणि त्यांचे नेते बिहारमध्ये एसआयआरबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. बिहार एसआयआरमधील अनियमिततेसाठी अजूनही १५ दिवस शिल्लक आहेत. जमिनीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष करून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन दशकांपासून सर्व राजकीय पक्ष मतदार यादीत दुरुस्तीची मागणी करत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने बिहारमधून एसआयआर सुरू केला आहे. निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी सारखेच खुले आहेत," असेही ज्ञानेश कुमार यावेली म्हणाले. 

मतदारांचे फोटो परवानगीशिवाय माध्यमांसमोर...ज्ञानेश कुमार पुढे म्हणाले, "आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिले की, अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर केले गेले. त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांचा वापर करण्यात आला. मतदारांचे फोटो, नावे आणि ओळख सार्वजनिकरित्या दाखवण्यात आली होती, जे पूर्णपणे चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटीहून अधिक कर्मचारी, १० लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट, उमेदवारांचे २० लाखांहून अधिक मतदान एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर इतक्या पारदर्शक प्रक्रियेत, कोणीही मत चोरू शकतो का?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

दुहेरी मतदानाचा आरोप फेटाळला“काही मतदारांनी दुहेरी मतदानाचा आरोप केला. जेव्हा पुरावे मागितले, तेव्हा कोणतेही उत्तर दिले नाही. अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग किंवा कोणताही मतदार घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतातील मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात असताना, आज निवडणूक आयोग सर्वांना हे स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग निर्भयपणे गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुणांसह सर्व वर्ग आणि सर्व धर्मांच्या मतदारांसोबत कोणताही भेदभाव न करता उभा आहे आणि उभा राहील,” असेही त्यांनी यावेली स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपा