शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांची राहुल गांधी घेणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 09:27 IST

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची झालेली नामुष्की तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बैठक घेणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याशी ही पहिलीच बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर कोण राहणार? यावर सध्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासोबत राहुल गांधी बैठक घेणार आहेत. 

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची झालेली नामुष्की तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनही काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री, महासचिव, प्रभारी आणि वरिष्ठ नेते पद सोडायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांमध्ये युवक काँग्रेसच्या बैठकीत त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खळबळ माजली होती. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी राहुल यांनी काँग्रेस कार्यकारणीची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र त्यावर कार्यकारणीने तो राजीनामा स्वीकारला नाही. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुका असणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील नेत्यांचीही यात बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीशी समझोता करण्याचा आग्रह धरला होता. येत्या ३ जुलैपासून माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील ‘वंचित’च्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करतील. समाधानकारक प्रस्ताव देऊन आघाडी करा, असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान