शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! आधी होणाऱ्या जावयासोबत पळाली, १० महिने राहिली; आता भावोजीसोबत पसार झाली, महिलेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:56 IST

Aligarh Women Love Story: घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना एक महिला तिचा होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाची गतवर्षी खूप चर्चा झाली होती. मात्र दहा महिने त्याच्यासोबत नांदल्यानंतर या महिलेच्या प्रेम कहाणीत आता वेगळाच ट्विस्ट आला आहे.

घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना एक महिला तिचा होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याच्या प्रकरणाची गतवर्षी खूप चर्चा झाली होती. कुटुंब, समाज कशाचीही पर्वा न करता मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत प्रेमाचे चाळे करत अलिगडमधील या महिलेने त्याच्यासोबतच नवा संसार थाटला होता. मात्र दहा महिने त्याच्यासोबत नांदल्यानंतर या महिलेच्या प्रेम कहाणीत आता वेगळाच ट्विस्ट आला असून, सदर महिला आता तिच्या भाओजीसोबत पसार झाली आहे. एवढंच नाही तर जाता जाता तिने घरातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिनेही लंपास केले आहेत. दरम्यान, आपल्यासोबत जवळपास दहा महिने राहिल्यानंतर ही महिला अचानक पळून गेल्याने त्रस्त झालेला तिचा प्रियकर असलेल्या राहुल याने तक्रार देण्यासाठी अलिगडमधील पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र हे प्रकरण बिहारमधील असल्याचं सांगत पोलिसांनी त्याला माघारी धाडले. त्यामुळे आता हे अजब प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही गतवर्षी एप्रिल महिन्यात झाली होती. १६ एप्रिल रोजी सदर महिलेच्या मुलीचा विवाह होणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाला १२ दिवस उरले असतानाच ही महिला तिचा होणारा जावई असलेल्या राहुल याच्यासोबत पसार झाली होती. मुलीचं लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या जावयासोबत सुरू झालेल्या बोलचालीतून सदर महिला त्याच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत राहण्यासाठी घरातून पळून गेल्याची माहिती नंतर समोर आली होती. दरम्यान, ही महिला घरातून जाताना लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागदागिने घेऊन गेली होती. या घटनेमुळे या महिलेचा पती आणि मुलीला जबर धक्का बसला होता.

मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हापासून सासूच्या मनात होणाऱ्या जावयाबाबत प्रेमाची भावना निर्माण झाली होती. जावयाला मोबाईल घेऊन देत सासूने पुढचे पाऊल टाकले होते. तासनतास हे दोघे फोनवर बोलत रहायचे. दरम्यान, हे दोघेही एके दिवशी संधी साधून अलिगडमधून पळून गेले होते. तसेच फिरून फिरून अखेरीस बिहारमधील मुझफ्फरपूर येथे पोहोचले होते. काही काळानंतर ते उत्तर प्रदेशमधील पोलिसांसमोर हजर झाले होते. तसेच इथे या महिलेने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर होणारा जावई राहुल आणि सदर महिला पती-पत्नीप्रमाणे राहू लागले होते.

सुमारे दहा महिने बिहारमध्ये पती पत्नी सारखे राहिल्यानंतर सदर महिला तिच्या भाओजीसोबत पळून गेली, असा आरोप आता राहुल याने केला आहे. एवढंच नाही तर तिने २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले, असा दावा त्याने केला. मी तिच्यासाठी घर सोडलं, समाजाचे टक्केटोमणे सहन केले. मात्र आता तीच मला सोडून गेली, अशा शब्दात राहुल याने आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, राहुल याने या संदर्भात अलिगडमधील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. मात्र हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे पोलिसांनी सांगिलते. त्यामुळे आता राहुल हा बिहारमधील मुझफ्फरपूर येते तक्रार दाखल करणार आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार