शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:05 IST

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, जगासाठी धाेकादायक ठरलेली दहशतवादी संघटना अल-कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र,  अल-कायदा भारत आणि काश्मीरकडे पुन्हा लक्ष केंद्रित करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. अल-कायदाची भारतीय उपखंडातील संघटना ‘क्यूआयएस’ने आपल्या ‘नवा-ए-अफगाण जिहाद’ या मासिकाचे नाव बदलून ‘नवा-ए-गजवाह-ए हिंद’ असे ठेवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अल-कायदाकडे सध्या एक कमकुवत संघटना म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, आता संघटनेला बळकटी मिळू लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.

अमली पदार्थांची तस्करी वाढलीतालिबाननी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून माेठ्या प्रमाणावर हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. २०२१ च्या उत्तरार्धानंतर तस्करी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये फार माेठ्या प्रमाणावर हेराॅईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे त्याचेच सूचक आहे.

अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनकअल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना २०२३पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान