शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:05 IST

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, जगासाठी धाेकादायक ठरलेली दहशतवादी संघटना अल-कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र,  अल-कायदा भारत आणि काश्मीरकडे पुन्हा लक्ष केंद्रित करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. अल-कायदाची भारतीय उपखंडातील संघटना ‘क्यूआयएस’ने आपल्या ‘नवा-ए-अफगाण जिहाद’ या मासिकाचे नाव बदलून ‘नवा-ए-गजवाह-ए हिंद’ असे ठेवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अल-कायदाकडे सध्या एक कमकुवत संघटना म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, आता संघटनेला बळकटी मिळू लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.

अमली पदार्थांची तस्करी वाढलीतालिबाननी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून माेठ्या प्रमाणावर हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. २०२१ च्या उत्तरार्धानंतर तस्करी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये फार माेठ्या प्रमाणावर हेराॅईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे त्याचेच सूचक आहे.

अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनकअल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना २०२३पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान