शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:05 IST

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, जगासाठी धाेकादायक ठरलेली दहशतवादी संघटना अल-कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र,  अल-कायदा भारत आणि काश्मीरकडे पुन्हा लक्ष केंद्रित करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. अल-कायदाची भारतीय उपखंडातील संघटना ‘क्यूआयएस’ने आपल्या ‘नवा-ए-अफगाण जिहाद’ या मासिकाचे नाव बदलून ‘नवा-ए-गजवाह-ए हिंद’ असे ठेवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अल-कायदाकडे सध्या एक कमकुवत संघटना म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, आता संघटनेला बळकटी मिळू लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.

अमली पदार्थांची तस्करी वाढलीतालिबाननी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून माेठ्या प्रमाणावर हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. २०२१ च्या उत्तरार्धानंतर तस्करी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये फार माेठ्या प्रमाणावर हेराॅईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे त्याचेच सूचक आहे.

अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनकअल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना २०२३पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान