शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

शास्त्र असतं ते... देधडक कायदे करणाऱ्या अमित शाहांना अक्षय कुमारचा मोलाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 09:54 IST

'अमित शाह देशातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. '

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार आज बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. अक्षय कुमारला व्हायरल होण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्याच्या सिनेमांसारखेच त्याच्या वक्तव्यावरून सुद्धा बातम्या तयार होतात. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  'मँगो' मुलाखत घेतली होती. ती मुलाखत चांगलीच चर्चेत आली होती. त्याच विषयाला अनुसरून अक्षय कुमाराने एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. 

दिल्लीत 'आजतक' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अँकरने अक्षय कुमारला गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी अँकरने अक्षय कुमारला विचारले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एखादा प्रश्न विचारायचा असेल किंवा एखादा सल्ला द्यायचा असेल, तर काय देशील? यावर अक्षय कुमारने अमित शाह यांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर जेवण करून नये, असा सल्ला दिला. तसेच, कोणीही सूर्यास्तानंतर जेवण करून नये. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सूर्यास्तानंतर जेवण करू नये, असे लिहिले आहे, असे सांगितले.    

मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "मी अमित शाह यांना फक्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करतो. ते देशातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर काहीही खाऊ नये, असे मी त्यांना सांगू इच्छितो." याचबरोबर, जर 6.30 वाजल्यानंतर अमित शाह यांनी खाणे बंद केल्यास त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. तसेच, सर्वांनीच असे करणे फायदेशीर आहे. आपल्या शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, सूर्यास्तानंतर कोणीही जेवण करू नये, असेही यावेळी अक्षय कुमारने सांगितले.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  'मँगो' मुलाखत घेतली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्यावेळी, तुम्ही आंबे खाता का? असा सवाल अक्षय कुमारने नरेंद्र मोदींना केला होता. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारAmit Shahअमित शहा