शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:27 IST

लोकसभा निवडणूक निकालाआधीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत डागली तोफ

Akhilesh Yadav vs BJP, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहेत, मात्र आजपासून विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सत्ताधारी असो की विरोधक, दोघेही विजयाचा दावा करत आहेत. या दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार निशाणा साधला. "भाजपाने मतदारांची फसवणूक करून निवडून आलेली सरकारे पाडली. तसेच राजकीय स्वार्थासाठी कुटुंबांमध्ये भांडणं लावली," अशा शब्दांत अखिलेश यादवांनी भाजपावर टीका केली.

"भाजपाने जनतेच्या आरोग्याशी खेळ केला. योग्य चाचणी न करता लस देण्यात आली. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली. भाजपाने निवडून आलेली सरकारे पाडली आणि राजकीय स्वार्थासाठी कुटुंबांमध्ये भांडणं लावली. यांच्या काळात महागाई वाढली, श्रीमंतांची कर्जे माफ झाली आणि मणिपूरसारख्या घटना घडल्या, पेपर फुटले, बेरोजगारी वाढली, महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले," असे अखिलेश यादव म्हणाले.

"भाजपाच्या काळातच मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. इलेक्टोरल बाँडमुळे महागाई वाढली. नोटाबंदीमुळे गरिबी वाढली. खतांच्या पोत्यांची अफरातफर केली. श्रीमंतांची कर्जे माफ झाली. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. गुन्हेगारांना पक्षात सामील करून घेतले. ज्यांनी शेतकऱ्यांची हत्या केली त्यांना मंत्रीपदी ठेवले. न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप केला. ईडी-सीबीआयचा वापर सरकार पाडण्यासाठी झाला आणि विकासाच्या नावाखाली खोटे आकडे दिले गेले," असा आरोपही यादव यांनी केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले आहेत. आता निकालाची प्रतीक्षा आहे. उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश