शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

योगींच्या इशाऱ्यावरून उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 5:17 PM

भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.

लखनऊ: नागरिकत्व संशोधन कायद्याला देशभरातून विरोध होत असून उत्तर प्रदेशात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. तर याच मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी ठरवत सरकारच्या आदेशानुसारच जाणीवपूर्वक जाळपोळ व हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे.

पुढे बोलताना अखिलेश म्हणाले की, ज्या प्रदेशाचे मुख्यमंत्री बदल्याची भाषा वापरत असेल. तेथील पोलिसांकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाला पोलीस जवाबदार असून, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक तोडफोड व वाहनांवर गोळीबार करण्यात आला असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केले आहे.

अर्थव्यवस्था, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुद्दय़ावर भाजपा पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी दंगली पसरवल्या जात आहेत. दंगलीचा फायदा भाजपला होतो. दंगल घडवून आणणारे लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तसेच भाजप जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे सुद्धा अखिलेश यादव म्हणाले.

देशातील हिंसाचाराच्या घटनेमुळे जगभरात देशाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 'ठोक देंगे आणि बदला ले लो' असे शब्द वापरले जात असल्याने परिस्थिती चिघळत असल्याचे आरोपही खिलेश यादव यांनी केला आहे.