शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

UP Election 2022: “एकत्र मिळून BJP ला साफ करून टाकू”; अखिलेश यादव भेटीनंतर ओपी राजभर यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 09:45 IST

UP Election 2022: समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफजनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली - राजभरयोगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज - राजभर

लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी राजकीय समीकरणेही वेगाने फिरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधी पक्ष सरसावल्याचे दिसत आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. यानंतर समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली. यावेळी एकत्र मिळून भाजपला विधानसभा निवडणुकीत चीतपट करू, असा एल्गार यावेळी करण्यात आला. 

यासंदर्भात समाजवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंचित, शोषित, मागासवर्ग, दलित, महिला, शेतकरी, तरुण अशा सर्व कमकुवत वर्गांसाठी समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष मिळून एकत्रितपणे लढेल. सपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफ, असा एल्गार करण्यात आला आहे. 

अबकी बार भाजप साफ

समाजवादी पक्षासह ओमप्रकाश राजभर यांनीही ट्विट केले आहे. अबकी बार, भाजप साफ, समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आले एकत्र. दलित, मागास तसेच अल्पसंख्यकांसह सर्व वर्गांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचे दिवस उरलेत फक्त चार, असा खोचक टोला ओमप्रकाश राजभर यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशमधील जनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. या दोन्ही पक्षाचे गठबंधन झाले, तर मऊ, बलिया, गाजीपूर, आझमगड, जौनपूर, आंबेडकर नगर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला. 

दरम्यान, अखिलेश यादव यांनी यापूर्वी कोणत्याही बड्या राजकीय पक्षासह युती किंवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा