शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

UP Election 2022: “एकत्र मिळून BJP ला साफ करून टाकू”; अखिलेश यादव भेटीनंतर ओपी राजभर यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 09:45 IST

UP Election 2022: समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफजनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली - राजभरयोगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज - राजभर

लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी राजकीय समीकरणेही वेगाने फिरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधी पक्ष सरसावल्याचे दिसत आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. यानंतर समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आली. यावेळी एकत्र मिळून भाजपला विधानसभा निवडणुकीत चीतपट करू, असा एल्गार यावेळी करण्यात आला. 

यासंदर्भात समाजवादी पक्षाकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वंचित, शोषित, मागासवर्ग, दलित, महिला, शेतकरी, तरुण अशा सर्व कमकुवत वर्गांसाठी समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष मिळून एकत्रितपणे लढेल. सपा आणि सुभासपा एक साथ, उत्तर प्रदेशमध्ये भाजप साफ, असा एल्गार करण्यात आला आहे. 

अबकी बार भाजप साफ

समाजवादी पक्षासह ओमप्रकाश राजभर यांनीही ट्विट केले आहे. अबकी बार, भाजप साफ, समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आले एकत्र. दलित, मागास तसेच अल्पसंख्यकांसह सर्व वर्गांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचे दिवस उरलेत फक्त चार, असा खोचक टोला ओमप्रकाश राजभर यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशमधील जनता भाजप आणि योगी सरकारला कंटाळली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. या दोन्ही पक्षाचे गठबंधन झाले, तर मऊ, बलिया, गाजीपूर, आझमगड, जौनपूर, आंबेडकर नगर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला. 

दरम्यान, अखिलेश यादव यांनी यापूर्वी कोणत्याही बड्या राजकीय पक्षासह युती किंवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा