शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

१० ते १५ वर्षांमध्येच पूर्ण हाेईल अखंड भारताचे स्वप्न, प्रगतीच्या वाटचालीत काेणी आडवे येऊ नये: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 7:12 AM

संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे.

हरिद्वार :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारत हा  सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षांमध्येच स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण हाेईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.हरिद्वार येथील कनखल येथे श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व गुरुत्रय मंदिराच्या लाेकार्पण साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. 

एका कार्यक्रमात बाेलताना त्यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे. मात्र, आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिल्यास १० ते १५ वर्षांमध्येच भारत अखंड हाेईल. भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यात जे आडवे येतील ते नष्ट हाेतील. 

भारताच्या प्रगतीच्या प्रवासात सर्वांनी साेबत यावे, थांबविण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्यांना साेबत यायचे नाही, त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे भागवत यांनी परखडपणे सांगितले. 

गेल्या वर्षीही भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अखंड भारताबाबत मत मांडले हाेते. भारतापासून वेगळे झालेले पाकिस्तानसारखे राष्ट्र संकटात आहे. अखंड भारत हा शक्ती नव्हे तर हिंदू धर्माच्या माध्यमातूनच निर्माण हाेऊ शकताे, असे ते म्हणाले हाेते.

हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म-    माेहन भागवत म्हणाले की, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. हजार वर्षांपर्यंत सनातन धर्माला समाप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. -    मात्र, ते संपले. आपण व सनातन धर्म आजही तिथेच आहे. 

अहिंसेचा पुरस्कार मात्र हातात दंडुके घेऊनच-    आम्ही अहिंसेचा पुरस्कार करताे. आमच्या मनात द्वेष नाही.-    मात्र, जग शक्तीलाच मानते. त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार हातात दंडुके घेऊनच हाेईल, असे माेहन भागवत म्हणाले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ