शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एका दिवसात नोटबंदी, ४ तासांत टाळेबंदी, मग २६ जानेवारीला 'इंटेलिजन्स'चे काय झाले?: हरसिमरत कौर

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 08:40 IST

केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून संसदेत विरोधक अधिक आक्रमक झाले असताना, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देहरसिमरत कौर बादल यांची केंद्र सरकारवर जोरदार टीकाशेतकऱ्यांसाठीचा काळा कायदा मागे घेण्याची मागणी२६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारावरून गुप्तचर विभागावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून संसदेत विरोधक अधिक आक्रमक झाले असताना, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार होणार, याचा अंदाज का आला नाही, गुप्तचर विभाग कुठे होता, अशी विचारणा हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. (akali dal leader harsimrat kaur criticized central government over farm law)

केंद्र सरकारने चार तासात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. एका दिवसात नोटबंदी जाहीर केली. असे असताना २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार होऊ शकतो, यासंदर्भातील सूचना गुप्तचर विभागाला मिळाली नाही का, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी गुप्तचर विभाग कुठे होता, असा रोकडा सवाल हरसिमरत कौर बादल यांनी लोकसभेत बोलताना उपस्थित केला. 

रायगडमध्ये अदानी उद्याेग समूह उभारणार 171 कोटींची जेट्टी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीखांचे मोठे योगदान

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शीख समुदायाचे मोठे योगदान होते. ७० टक्के शीखांचे हौतात्म्य देशाच्या कामी आले, असा दावा करत निशान साहिब ध्वजाला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. आपण सर्वांनाच खलिस्तानी ठरवून मोकळे होत आहात. आमच्या ९ व्या गुरुंनी तुमच्या लोकांच्या रक्षणासाठी स्वतः कामी आले, असे हरसिमरत कौर बादल म्हणाल्या.

त्यासाठी जबाबदार कोण?

दीडशेहून अधिक आंदोलनकांनी आपला जीव गमावला. ते आमचे अन्नदाते आहेत. मात्र, त्यांच्याबाबत संवेदना दाखवत एकही शब्द बोलला गेला नाही. २६ जानेवारीला झालेला हिंसाचार होणे दुर्दैवाचे आहे. मात्र, यात गुप्तचर विभाग फेल गेला, त्याचे उत्तर कोण देणार, त्यासाठी जबाबदार कोणाला धरायचे, असे प्रश्न हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी उपस्थित केले. 

काळा कायदा मागे घ्या

सहा महिन्यांपूर्वी अध्यादेश आणला गेला. तेव्हापासून शेतकरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार मूक गिळून गप्प बसलेय. शेतकऱ्यांना कायदा नको असेल, तर हा काळा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करत या कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार भारतीय खाद्य निगमला खरेदी आणि विक्री प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. म्हणूनच शेतकरी चिंतेत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेत केला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकार