शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात नोटबंदी, ४ तासांत टाळेबंदी, मग २६ जानेवारीला 'इंटेलिजन्स'चे काय झाले?: हरसिमरत कौर

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 08:40 IST

केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून संसदेत विरोधक अधिक आक्रमक झाले असताना, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देहरसिमरत कौर बादल यांची केंद्र सरकारवर जोरदार टीकाशेतकऱ्यांसाठीचा काळा कायदा मागे घेण्याची मागणी२६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारावरून गुप्तचर विभागावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून संसदेत विरोधक अधिक आक्रमक झाले असताना, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार होणार, याचा अंदाज का आला नाही, गुप्तचर विभाग कुठे होता, अशी विचारणा हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. (akali dal leader harsimrat kaur criticized central government over farm law)

केंद्र सरकारने चार तासात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. एका दिवसात नोटबंदी जाहीर केली. असे असताना २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार होऊ शकतो, यासंदर्भातील सूचना गुप्तचर विभागाला मिळाली नाही का, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी गुप्तचर विभाग कुठे होता, असा रोकडा सवाल हरसिमरत कौर बादल यांनी लोकसभेत बोलताना उपस्थित केला. 

रायगडमध्ये अदानी उद्याेग समूह उभारणार 171 कोटींची जेट्टी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीखांचे मोठे योगदान

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शीख समुदायाचे मोठे योगदान होते. ७० टक्के शीखांचे हौतात्म्य देशाच्या कामी आले, असा दावा करत निशान साहिब ध्वजाला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. आपण सर्वांनाच खलिस्तानी ठरवून मोकळे होत आहात. आमच्या ९ व्या गुरुंनी तुमच्या लोकांच्या रक्षणासाठी स्वतः कामी आले, असे हरसिमरत कौर बादल म्हणाल्या.

त्यासाठी जबाबदार कोण?

दीडशेहून अधिक आंदोलनकांनी आपला जीव गमावला. ते आमचे अन्नदाते आहेत. मात्र, त्यांच्याबाबत संवेदना दाखवत एकही शब्द बोलला गेला नाही. २६ जानेवारीला झालेला हिंसाचार होणे दुर्दैवाचे आहे. मात्र, यात गुप्तचर विभाग फेल गेला, त्याचे उत्तर कोण देणार, त्यासाठी जबाबदार कोणाला धरायचे, असे प्रश्न हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी उपस्थित केले. 

काळा कायदा मागे घ्या

सहा महिन्यांपूर्वी अध्यादेश आणला गेला. तेव्हापासून शेतकरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार मूक गिळून गप्प बसलेय. शेतकऱ्यांना कायदा नको असेल, तर हा काळा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करत या कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार भारतीय खाद्य निगमला खरेदी आणि विक्री प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. म्हणूनच शेतकरी चिंतेत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेत केला.

टॅग्स :lok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकार