शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 14:56 IST

राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Ajmer Dargah Shiv Mandir: अजमेर दर्गा असलेल्या ठिकाणी पूर्वी शिव मंदिर होतं, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून, यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाही नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवा मुद्दा राजकीय पटलावर आला असून, यावरून एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. 

राजस्थानमधील अजमेर येथे असलेला प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने दर्गा प्रशासन आणि इतरांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

असदुद्दीन ओवेसी काय बोलले?

अजमेर शरीफ दर्गा प्रकरणावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "८०० वर्षांपासून तिथे दर्गा शरीफ आहेत. ८०० वर्षात अल्लाउद्दीन खिलजीपासून, अमीर खुसरोचे पुस्तक आहे, त्यात या दर्ग्याबद्दल लिहिलेलं आहे. बादशाह अकबराने तिथे अनेक गोष्टी केल्या. मुघलाचं शासन जेव्हा संपलं. मराठ्यांची राज्य आलं. त्यानंतर त्यांचं शासन कमी होत गेलं, तेव्हा त्यांनी १८००० रुपयांमध्ये तो ब्रिटिशांना दिला."

"त्यावेळी जयपूरच्या राजघराण्याने या दर्ग्यासाठी ४० किलो चांदी दिली होती. त्यांनी दर्ग्याची सेवा केली. देशाचे पंतप्रधान तिथे चादर चढवतात. आपल्या शेजारील राष्ट्राचे शिष्टमंडळ तिथे जातात. जगभरातील लोक तिथे येतात. आज अचानक तुम्ही ही कृती करत आहात. सलीम चिश्तीची दर्गा नाहीये. ख्वाजा गरीब नवाजांची दर्गा नाहीये. हे कुठे थांबवणार आहे?", असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. 

धनंजय चंद्रचूड यांच्या निकालाबद्दल ओवेसी काय बोलले?

"प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१ चं (places of worship act 1991) काय होणार? डी.वाय. चंद्रचूड आता सरन्यायाधीश नाहीयेत. आता त्यांच्या मनात विचार येतोय का की, त्यांनी हे थांबवलं असतं. राम मंदिराच्या निकालात त्यांनी places of worship act 1991 हा मूळ गाभ्याचा हिस्सा आहे. त्यानंतर सरन्यायाधीश शांत झाले. आता चंद्रचूड त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक ठिकाणी माध्यमांना मुलाखती देत बसले आहेत. बघा त्यांनी हे काय करून ठेवलं आहे", असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

मोदींनी चादर चढवली, ते सांगणार का की तो दर्गा आहे की नाही?

"तुम्ही बघितलं संबलमध्ये काय झालं. पाच लोकांचा मृत्यू झाला. आता भारत सरकारच्या अल्पसंख्याक विभागाला पक्ष बनवण्यात आले आहे. आता नरेंद्र मोदींचं सरकार, मोदी त्यावर चादर चढवली, ते सांगणार आहेत की, तो दर्गा आहे की नाही? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग काय सांगणार? हे सगळं देशाला अस्थिर करण्यासाठी आहे. हे देशाच्या हिताचं नाहीये. हे जे लोक आहेत, यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही", असे ओवेसी म्हणाले.     

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRajasthanराजस्थानSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी