शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

अजित पवार नाराज नाहीत: शरद पवार; आधीपासूनच जबाबदाऱ्या असल्याचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 08:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादांच्या नाराजीचा मुद्दा फेटाळून लावला.

अजित पवार आणि जयंत पाटील हे खुश नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच जबाबदाऱ्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कोणतीही पक्षांतर्गत जबाबदारी नव्हती. पक्षकार्यासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी होती. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे नाव एक महिन्यापासून सुचवले होते. त्यावर आज निर्णय घेण्यात आला. अन्य राज्यांमध्ये पक्षकार्य वाढविण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याची गरज होती. त्यासाठी एक नव्हे तर दोन कार्याध्यक्ष नेमून त्यांना प्रत्येकी चार ते पाच राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे पवार यांनी ६, जनपथ येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्षाध्यक्षपद रिक्त नाही...

सोळा वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे लोकसभेत अनुभवी नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. दिल्लीपासून पंजाब आणि हरयाणा जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे ही राज्ये देण्यात आली आहेत. प्रफुल्ल पटेल जिथे राहतात त्या गोंदियापासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे ही राज्ये त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. भविष्यात पटेल किंवा सुळे यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार असे विचारले असता सध्या आपणच अध्यक्ष असून, ती जागा रिक्त नाही, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केली.

विरोधी ऐक्यासाठी काम करणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. पाटणा येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणकोणते पक्ष येतात हे दिसेलच, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात लोक भाजपला धडा शिकवतील 

महाराष्ट्रात भाजप नसलेल्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरत असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीने वक्तव्ये करीत आहे. असे तीन-चार ठिकाणी घडले आहे. पण, अंतिमतः महाराष्ट्राची जनता या लोकांना धडा शिकवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस