शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
2
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
3
"माझ्या नादाला लागाल तर..." ठाण्याच्या माजी महापौरांची आगरी समाजाविषयी कथित ऑडिओ क्लीप चर्चेत, षड्यंत्र असल्याचा आरोप
4
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
5
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
6
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
7
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
8
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
9
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
10
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
11
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
12
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
13
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
14
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
15
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
16
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
17
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
18
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
19
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
20
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार नाराज नाहीत: शरद पवार; आधीपासूनच जबाबदाऱ्या असल्याचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 08:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादांच्या नाराजीचा मुद्दा फेटाळून लावला.

अजित पवार आणि जयंत पाटील हे खुश नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच जबाबदाऱ्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कोणतीही पक्षांतर्गत जबाबदारी नव्हती. पक्षकार्यासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी होती. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे नाव एक महिन्यापासून सुचवले होते. त्यावर आज निर्णय घेण्यात आला. अन्य राज्यांमध्ये पक्षकार्य वाढविण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याची गरज होती. त्यासाठी एक नव्हे तर दोन कार्याध्यक्ष नेमून त्यांना प्रत्येकी चार ते पाच राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे पवार यांनी ६, जनपथ येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्षाध्यक्षपद रिक्त नाही...

सोळा वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे लोकसभेत अनुभवी नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. दिल्लीपासून पंजाब आणि हरयाणा जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे ही राज्ये देण्यात आली आहेत. प्रफुल्ल पटेल जिथे राहतात त्या गोंदियापासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे ही राज्ये त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. भविष्यात पटेल किंवा सुळे यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार असे विचारले असता सध्या आपणच अध्यक्ष असून, ती जागा रिक्त नाही, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केली.

विरोधी ऐक्यासाठी काम करणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. पाटणा येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणकोणते पक्ष येतात हे दिसेलच, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात लोक भाजपला धडा शिकवतील 

महाराष्ट्रात भाजप नसलेल्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरत असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीने वक्तव्ये करीत आहे. असे तीन-चार ठिकाणी घडले आहे. पण, अंतिमतः महाराष्ट्राची जनता या लोकांना धडा शिकवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस