शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार नाराज नाहीत: शरद पवार; आधीपासूनच जबाबदाऱ्या असल्याचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 08:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा चुकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादांच्या नाराजीचा मुद्दा फेटाळून लावला.

अजित पवार आणि जयंत पाटील हे खुश नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच जबाबदाऱ्या आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कोणतीही पक्षांतर्गत जबाबदारी नव्हती. पक्षकार्यासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी होती. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे नाव एक महिन्यापासून सुचवले होते. त्यावर आज निर्णय घेण्यात आला. अन्य राज्यांमध्ये पक्षकार्य वाढविण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याची गरज होती. त्यासाठी एक नव्हे तर दोन कार्याध्यक्ष नेमून त्यांना प्रत्येकी चार ते पाच राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे पवार यांनी ६, जनपथ येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पक्षाध्यक्षपद रिक्त नाही...

सोळा वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे लोकसभेत अनुभवी नेत्या म्हणून प्रस्थापित झाल्या आहेत. दिल्लीपासून पंजाब आणि हरयाणा जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे ही राज्ये देण्यात आली आहेत. प्रफुल्ल पटेल जिथे राहतात त्या गोंदियापासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे ही राज्ये त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. भविष्यात पटेल किंवा सुळे यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार असे विचारले असता सध्या आपणच अध्यक्ष असून, ती जागा रिक्त नाही, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केली.

विरोधी ऐक्यासाठी काम करणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे. पाटणा येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणकोणते पक्ष येतात हे दिसेलच, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात लोक भाजपला धडा शिकवतील 

महाराष्ट्रात भाजप नसलेल्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरत असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीने वक्तव्ये करीत आहे. असे तीन-चार ठिकाणी घडले आहे. पण, अंतिमतः महाराष्ट्राची जनता या लोकांना धडा शिकवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस