शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 18:59 IST

हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार  गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली.

नवी दिल्ली – राष्ट्रवादी कुणाची यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शरद पवार गटाने मोठा दावा करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने आयोगासमोर दाखल केलेले शपथपत्रे बोगस असल्याचं शरद पवार गटाने म्हणत अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाची बाजू मांडणारे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, जवळपास दीड तास निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. आम्ही आजच्या सुनावणीत अनेक धक्कादायक वस्तूस्थिती आयोगासमोर ठेवली. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर दाखल केलीत, जवळपास २० हजार प्रतिज्ञापत्रे आम्ही तपासली. त्यातील ८९०० प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचे आम्ही सांगितले. जी व्यक्ती मृत आहे त्यांचेही प्रतिज्ञापत्र दाखल केलेत. काही अल्पवयीन लोकांचे प्रतिज्ञापत्र दिलेत, काही अशी पदे आहेत जी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात नाही. काही कागदपत्रात केवळ हाऊसवाईफ, झॉमेटो सेल्समन म्हणून सह्या केल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आम्ही २४ कॅटेगिरी बनवली असून त्यातून अजित पवार गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत. बनावटरित्या तयार करण्यात आली आहेत. केवळ खोट्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. याचा अर्थ असा अजित पवार गटाकडे कुठलेही समर्थन नाही. हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार  गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली. खोटी कागदपत्रे, खोटे जबाब नोंदवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० तारखेला होणार असून या प्रकरणात सत्याचा विजय होईल असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.

काय आहे वाद?

 शिवसेनेपाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीतच २ गट पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर अजित पवार गटाने हा पक्षाचा निर्णय असून राष्ट्रवादी म्हणूनच ते सरकारमध्ये सहभागी झाल्याचं सांगितले. एकप्रकारे अजित पवार गटाने राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला. सध्या निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यात सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग