शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
3
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
4
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
5
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
6
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
7
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
9
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
10
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
11
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
12
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
13
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
14
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
15
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
16
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
17
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
18
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
19
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
20
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
Daily Top 2Weekly Top 5

युद्धात हवाई सुरक्षा महत्त्वाची - लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:25 IST

एअर डिफेन्स कमांडची लवकरच स्थापना!

भावेश ब्राह्मणकर 

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यात आपले हेलिकॉप्टर आपल्याच हद्दीत कोसळणे ही तांत्रिक चूक होती; पण आता अशा चुका होणार नाहीत. युद्धात हवाई सुरक्षा सर्वात महत्त्वाची ठरते. त्यामुळे लवकरच ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापण्यात येईल, अशी माहिती नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज नरवणे ‘लोकमत’ला विशेष मुलाखतीद्वारे दिली. सीमा सुरक्षा, पर्यावरण रक्षण, आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञान या विषयावरही लष्करप्रमुख विस्तृतपणे बोलले

संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत काय सांगाल?संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेत वाढ करणे हा त्याचा उद्देश होता. या समितीच्या शिफारशींनुसार अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सीमेवर योग्य ती रसद पुरवण्यासाठी उपाययोजना करण्याचीही शिफारस आहे. त्यानुसार सीमेवर रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. काही ठिकाणी वाहनांचे डेपोही उभारत आहोत.

लष्करी प्रशिक्षणातील आव्हाने कोणती?आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणावर विशेष भर देत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र आणि बहुविध संकल्पनांचा केवळ अवलंब करून उपयोग नाही. त्यामुळे जवानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे काम प्राईस वॉटर हाऊस कंपनीला काम देण्यात आले आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. तो यशस्वी झाला, तर त्याची व्यापक अंमलबजावणी केली जाईल.

संरक्षण क्षेत्राला ‘मेक इन इंडिया’चा फायदा झाला?‘मेक इन इंडिया’चा मोठा फायदा होत आहे. लष्कराने एका अधिकाºयाला विशेष जबाबदारी दिली आहे. त्याद्वारे खासगी भारतीय थेट किंवा परदेशी कंपन्यांसमवेत संयुक्त प्रस्ताव देतात. त्यावर विचार होतो. आवश्यक त्याबाबी आम्ही त्यांना सांगतो. आतापर्यंत सुमारे नऊ प्रस्तावांना मान्यता दिली असून, काही विचाराधीन आहेत. यापुढेही हे सुरूच राहील.

आपण नुकताच सियाचीन दौरा केलात. त्याविषयी..?सियाचीनची पोस्ट भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मी तिथे जाऊन आलो. पाकिस्तान व चीन या शेजाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ही पोस्ट महत्त्वाची आहे. नैसर्गिक आव्हाने असूनही तिथे आपले जवान सज्ज आहेत.पर्यावरण सुरक्षाही महत्त्वाची आहेअर्थातच. पर्यावरण सुरक्षित राहिले पाहिजे, असे लष्करालाही वाटते. त्यामुळे कॅन्टॉन्मेंट बोर्ड असो की, लष्कराच्या अखत्यारीत येणारी ठिकाणे, आमचा परिसर हिरवा राहील, याची आम्ही काळजी घेतो. जवळपास सर्व ठिकाणी सौर ऊर्जा व एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. वरिष्ठ अधिकारी ई-कारचा वापर करतात. हा वापर वाढवायचा आहे. त्यामुळे पर्यावरणास हातभार लागेल. पर्यावरणस्नेही योजना आम्ही जाणीवपूर्वक राबवतो.लष्कराचे वैशिष्ट्य काय?आपले लष्कर अतिशय प्रतिष्ठित व व्यावसायिक पद्धतीने काम करते. शिस्त ही लष्कराची ओळख आहे. भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च असून, तीच लष्कराचा मार्गदर्शन करीत आहे.

आगामी वाटचाल कशी असेल?गुणवत्ता, प्रशिक्षण, विश्वास, मान्यता यांना आम्ही महत्त्व देतो. कुठलेही आव्हान परतवून लावण्याची ताकद लष्करात आहे. प्रतिकूल परिस्थितीलाही आपले जवान धैर्याने समर्थपणे तोंड देत आहेत. विजयश्री मिळवत आहेत. आजवरच्या युद्धांनी ते सिद्ध केले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान