शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

...तर 'त्या' भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी घटणार; महाराष्ट्रासाठी परिस्थिती आणखी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 14:14 IST

वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर; तब्बल ४८ कोटी भारतीयांच्या प्रकृतीवर परिणाम

नवी दिल्ली: जगातील वायू प्रदूषणाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. याचा थेट परिणाम पर्यावरण आणि माणसाच्या आरोग्यावर होत आहे. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य कमी होण्याची भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील संशोधक गटानं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी कमी होऊ शकतं, अशी भीती संशोधक गटाकडून वर्तवण्यात आली आहे.

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटनं (ईपीआयसी) वायू प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दलचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे तब्बल ४८ कोटी लोक वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. या वायू प्रदूषणाचं स्वरुप गंभीर आहे. भौगोलिक स्थिती विचारात घेतल्यास वायू प्रदूषणाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याची माहिती अहवालात आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेचा दर्जा वेगानं घसरत असल्याचं अहवाल सांगतो.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी २०१९ मध्ये स्वच्छ हवा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचं अहवालातून कौतुक करण्यात आलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली लक्ष्य पूर्ण झाल्यास देशातील नागरिकांचं आयुमान १.७ वर्षांनी, तर दिल्लीतल्या नागरिकांचं आयुष्य ३.१ वर्षांनी वाढेल. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतल्या प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे.

औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ हवा अभियान सुरू करण्यात आलं. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. २०२४ पर्यंत देशातील १०२ शहरांतील प्रदूषण २० ते ३० टक्के कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण