शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Air India: विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:15 IST

Air India, Tata: एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या

मुंबई - एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध विमानतळांवर धूळ खात पडून असलेल्या विमानांनाही पुन्हा सेवेमध्ये आणण्यात येणार आहे.

विमानतळांच्या हँगरमध्ये उभ्या असलेल्या विमानांना दुरुस्त करून त्यांना सेवेत आणण्याचा एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटांचा विचार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यात मदत मिळेल. ही विमानं इंजिनाची ओव्हरहॉलिंग नसल्याने किंवा स्पेअर पार्ट्स नसल्याने बंद पडलेली आहेत. यामध्ये नॅरो बॉडीपासून वाइ़डबॉडी असलेल्या विमानांचा समावेश आहे. 

एअर इंडिया डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल रूटवर सेवा देणारी प्रमुक कंपनी आहे.  अशा परिस्थितीत कंपनीची बंद पडलेली विमानं दुरुस्त झाल्यानंतर सेवा अधिक सुधरू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कंपनीकडे नॅरोबॉडी असलेली २५ विमानं आहेत. तक अनेक बोईंग ७७७ आणि ७८७ विमानांचाही समावेश आहे. सध्या एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या हँगर्समध्ये ८-१० ए३२० विमानांना दुरुस्त करण्यात आले आहे. तर पुढच्या तीन महिन्यांमध्ये अनेक बोईंग ७८७ विमानांना दुरुस्त करून सेवेत आणण्याची कंपनीची योजना आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाचा मालकी हक्क हल्लीच टाटा समुहाने खरेदी केला होता. त्यासाठी टाटा समुहाने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. १९३२ रोजी जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर ६९ वर्षांनी पुन्हा एकदा ही कंपनी टाटा कंपनीच्या ताब्यात आली आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान