शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:43 IST

२७ वर्षापूर्वी १९९८ साली  जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता

अहमदाबाद - गुजरातमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात होऊन २९७ लोकांचा जीव गेला आहे. या दुर्घटनेतील विमानातील केवळ एकमेव प्रवासी जिवंत वाचला आहे. रमेश विश्वासकुमार हे दुर्घटनेतून बचावल्यामुळे हा चमत्कारच घडल्याचं मानले जात आहे. रमेश विमानात 11A सीटवर बसले होते, जेव्हा प्लेन क्रॅश झाले तेव्हा तिथला आपत्कालीन दरवाजा उघडला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत ते जखमी झाले असले तरी सुखरूप वाचले आहे. परंतु २७ वर्षापूर्वी अशाच एका अपघातात थाई अभिनेत्याचा जीव वाचला होता. 

विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला

२७ वर्षापूर्वी १९९८ साली  जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता. त्यामुळे हा कसला संयोग म्हणावा असा प्रश्न लोकांना पडला आहे. थायलँडमधील अभिनेता रुआंगसाक लोयचुसाकने सांगितले की, जेव्हा मी एअर इंडियाच्या विमान क्रॅशबाबत ऐकले तेव्हा एक अजब संयोग जाणवून आला. ११ डिसेंबर १९९८ साली मी २० वर्षाचा होतो तेव्हा थाई एअरवेजने फ्लाइट नंबर TG261 चा अपघात घडला. त्यात १४६ प्रवासी होते त्यातील १०१ लोकांचा मृत्यू झाला होता. 

फेसबुकवर लिहिली पोस्ट

४७ वर्षीय रुआंगसाक लोयचुसाक यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, जेव्हा मला एअर इंडियाच्या विमान अपघातात रमेश विश्वासकुमार हा ब्रिटीश नागरिक चमत्कारिकपणे वाचल्याचे कळले आणि या अपघातावेळी तो 11A वर बसल्याचे सांगितले तेव्हा मला जुनी आठवण ताजी झाली आणि माझ्या अंगावर काटा आला. माझ्यासोबत घडलेल्या विमान अपघाततही माझा सीट नंबर 11A हाच होता. माझा जीवही त्या अपघातातून नशिबाने वाचला होता. भारतातील विमान अपघातात वाचलेला व्यक्ती तो माझ्यासारखाच 11A सीटवर बसला होता असं त्याने सांगितले.

१० वर्ष विमान प्रवास केला नाही

त्याशिवाय १९९८ मध्ये बोर्डिंग पास नव्हता परंतु न्यूजपेपरमध्ये माझ्या सीटचा नंबर ११ ए असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखे होते, ज्याची झळ मला आजही बसते. या अपघातानंतर मी १० वर्ष विमान प्रवास केला नाही असं रुआंगचुसाकने म्हटलं.

२९७ लोकांचा गेला जीव

गुजरातच्या अहमदाबादहून लंडनसाठी जाणारे एअर इंडियाचे एआय १७१ विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांनी जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी २४१ लोकांचा जीव गेला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या विमानाला धडकले तिथेही ५६ जणांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघातातून केवळ रमेश विश्वासकुमार एकटेच बचावले. त्यांचा सीट नंबर ११ ए होता. अखेर ते जिवंत कसे राहिले हे त्यांनाही माहिती नाही. मी मरणार असं मला वाटत होते. परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी जिवंत असल्याची जाणीव झाली. मी सीटबेल्ट काढला आणि शक्य तिथे पळण्याचा प्रयत्न केला असं रमेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद