शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:50 IST

Ahmedabad Plane Crash Survivor : रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते

अहमदाबाद - गुरुवारी दुपारी लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. हा अपघात इतका भयंकर होता की दुर्घटनेनंतर विमान जळून खाक झाले. त्याशिवाय ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीलाही आग लागली. या विमानात २ पायलट, १० क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. भीषण दुर्घटनेत कुणीही वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात आले. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार विमान अपघातातून एक प्रवासी सुखरूप असल्याचे पुढे आले आहे.

या दुर्घटनेबाबत अहमदाबाद पोलीस आयुक्त जी.एस मलिक यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एक प्रवासी जिवंत आढळला आहे. हा प्रवासी A11 या सीट नंबरवर होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्याबाबत अद्याप सांगू शकत नाही. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे कारण विमान नागरी वस्तीत कोसळले आहे असं त्यांनी म्हटलं.

माहितीनुसार, या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असं आहे, ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. ज्यात एक जोरदार स्फोट झाला. चहुबाजूने आग लागली होती. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला आणले. मी जिवंत आहे यावर मला विश्वास बसत नाही. हे चमत्कारापेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते. परंतु जेव्हा हे विमान क्रॅश झाले तेव्हा आपत्कालीन दरवाजातून त्यांनी उडी घेतली असल्याचे बोलले जाते. एअर इंडियाच्या या दुर्घटनेत जवळपास २०० हून अधिक प्रवासी मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटींची मदत करण्याचं जाहीर केले आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातTataटाटा