शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:25 IST

१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे

अहमदाबाद - गुजरातच्या भीषण विमान अपघाताने देशाला सुन्न केले आहे. या अपघातातील मृत लोकांची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनसाठी झेपावलेले विमान अवघ्या काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले आणि भयंकर दुर्घटना घडली. या अपघातात वडोदरा शहर परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबात अपघाताच्या २ दिवस आधी लग्नसोहळ्याने आनंद होता परंतु या अपघातामुळे हा आनंद काही तासांपुरता मर्यादित राहिला.

१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाविक माहेश्वरी मागील अनेक वर्षापासून लंडनला काम करत होता. प्रत्येक वर्षी १५ दिवस सुट्टी काढून तो वडोदरा इथे त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा. यावेळीही भाविक भारतात आला. मात्र यंदा लग्न करूनच लंडनला जा असा आग्रह कुटुंबाने धरला. भाविकचा आधीच साखरपुडा झाला होता त्यामुळे कुटुंबाच्या सहमतीने त्याने १० जून रोजी कोर्टात लग्न केले. 

लग्नानंतर भाविक पुन्हा कामासाठी लंडनला जाणार होता. त्यामुळे त्याच्या नवविवाहित पत्नी हसत हसत त्याला निरोप दिला. परंतु हा त्याचा अखेरचा निरोप असेल असं कुणालाही वाटले नाही. फ्लाईटमध्ये चढल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्याची बातमी कानी आली. याच विमानात भाविक असल्याचं कळताच कुटुंब हादरले. या दुर्घटनेतून कुणीची वाचण्याची शक्यता नव्हती. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात भाविकचा मृत्यू झाल्याचं कुटुंब मानायला तयार नाही. वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव नाही. २ दिवसांपूर्वीच लग्नाची मिठाई सर्वांना वाटली आणि आज भयाण शांतता पसरली. 

विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू

अहमदाबाद ते लंडनला जाणारे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे केवळ प्रवाशांचा जीव गेला नाही तर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न, भविष्य आणि आशाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुणी मुलगा, कुणी वडील तर कुणी अख्खं कुटुंबच अपघातात गमावले आहे. या अपघातामुळे ज्यांच्या परतण्याची वाट पाहायची होती ते आता कधीच परतणार नसल्याने कुटुंब शोकाकूळ आहेत. या अपघातात असे लोकही गेले आहेत ज्यांनी पहिल्यांदा विमान प्रवास सुरू करत स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवत लंडनला चालले होते. मात्र हे सर्व अपूर्णच राहिले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद