शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:06 IST

विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाच्या एआय १७१ फ्लाईटचा भीषण अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशी मृत पावले. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया प्रशासन हा नंबर बदलण्याच्या तयारीत आहे. या मागचा हेतू म्हणजे या भयंकर अपघाताची कटू आठवण विसरण्यासाठी केले जाणार आहे. सामान्यत: एका भीषण अपघातानंतर एअरलाईन्स संबंधित उड्डाण संख्येचा वापर करणे बंद करते. 

विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे. आता यापुढे अहमदाबाद ते लंडनला जाणाऱ्या विमानाचा नंबर AI 171 ऐवजी AI 159 करण्यात आला आहे. १७ जूनपासून बुकिंग प्रणालीत आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. हा फ्लाईट नंबर बदलण्यामागे एक खास हेतू आहे. आकडा बदलल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानातील मृतांच्या कुटुंबांना आणि इतरांनाही त्यातून सावरण्यासाठी मदत मिळेल. एअर इंडिया एक्सप्रेसनेही त्यांची उड्डाणसंख्या  IX 171 बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. उड्डाण संख्या १७१ बंद करून अपघातातील मृतांप्रती सन्मान दिला जातो. 

याआधी कधी घडले होते?

याआधी २०२० मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचा कोझीकोडमध्ये अपघात झाला. त्यानंतर संबंधित विमानाची उड्डाण संख्या नंबर वापरण्यास बंद करण्यात आले. या दुर्घटनेत २१ लोक मारले गेले होते. २०१४ साली मलेशियातही हेच घडले होते तेव्हा मलेशियन एअरलाईन्सने कुआंलपूरवरून उड्डाण करणाऱ्या एमएच ३७० चे नाव बदलून एमएच ३१८ केले होते. फ्लाईट एमएच ३७० ही ८ मार्च २०१४ साली रडारवरून गायब झाली होती. या विमानात २३९ प्रवासी होते. आजपर्यंत या विमानाचा पत्ता लागला नाही. त्याशिवाय लायन एअरनेही त्यांच्या फ्लाईट जेटी ६१० चे नाव बदलून जेटी ६१८ केले होते. हे विमान २९ ऑक्टोबर २०१८ मध्ये जावा समुद्रात क्रॅश झाले होते. या विमानात चालकासह एकूण १८९ प्रवासी होते. 

नेमका कसा झाला अपघात?

गुरुवारी एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादहून लंडनसाठी चालले होते. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगाल, १ कॅनडाच्या नागरिकाचा समावेश होता. यात १०३ पुरुष, ११४ महिला आणि ११ मुले, २ नवजात बालकांसह १२ क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही क्षणातच हे विमान अहमदाबादच्या एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले. हे विमान ज्या इमारतीला धडकले तिथे ५०-६० निवासी डॉक्टर होते. काहीजण मेसमध्ये जेवत होते. या भीषण दुर्घटनेत मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातahmedabadअहमदाबाद