शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:31 IST

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.

अहमदाबाद - १२ जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला. या अपघातात २५० हून अधिक लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेतर शनिवारी पहिल्यांदाच नागरी उड्डाण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. एअर इंडिया फ्लाईट एआय १७१ ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंचीवर पोहचू शकले. ज्यानंतर हे विमान वेगाने खाली आले असं मंत्रालयाने सांगितले.

टेकऑफच्या १ मिनिटांनी पडले विमान, पायलटने दिला होता 'मेडे' कॉल

या पत्रकार परिषदेत नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंची गाठू शकली. त्यानंतर हे विमान खाली येऊ लागले. पायलटने दुपारी १.३९ वाजता एटीसीला मे डे कॉल दिला होता. एक मिनिटानंतर विमान मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या दुर्घटनेआधी हे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबादला विना कुठल्याही तांत्रिक समस्येशिवाय पोहचले होते असंही त्यांनी सांगितले. 

उच्चस्तरीय समितीची स्थापना

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती ३ महिन्यात त्यांचा रिपोर्ट सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. समिती हा अपघात नेमका कसा घडला त्यामागची कारणे तपासेल. सध्याची एसओपी आणि दिशा निर्देशांचा आढावा घेईल आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय पाऊले उचलावी लागतील याची शिफारस करतील. 

ड्रीमलायनरची चौकशी सुरू, ८ विमानांची तपासणी

दरम्यान, DCGA च्या निर्देशानंतर बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची चौकशी होणार आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलायनर आहेत ज्यातील ८ विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. ज्यातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे केवळ एकमेव प्रवासी या भीषण अपघातातून सुखरूप बचावला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज परिसरातील इमारतीला धडकले तिथल्या ४० हून अधिक जणांचा जीव गेल्याची भीती वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद