शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:31 IST

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.

अहमदाबाद - १२ जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला. या अपघातात २५० हून अधिक लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेतर शनिवारी पहिल्यांदाच नागरी उड्डाण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. एअर इंडिया फ्लाईट एआय १७१ ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंचीवर पोहचू शकले. ज्यानंतर हे विमान वेगाने खाली आले असं मंत्रालयाने सांगितले.

टेकऑफच्या १ मिनिटांनी पडले विमान, पायलटने दिला होता 'मेडे' कॉल

या पत्रकार परिषदेत नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंची गाठू शकली. त्यानंतर हे विमान खाली येऊ लागले. पायलटने दुपारी १.३९ वाजता एटीसीला मे डे कॉल दिला होता. एक मिनिटानंतर विमान मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या दुर्घटनेआधी हे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबादला विना कुठल्याही तांत्रिक समस्येशिवाय पोहचले होते असंही त्यांनी सांगितले. 

उच्चस्तरीय समितीची स्थापना

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती ३ महिन्यात त्यांचा रिपोर्ट सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. समिती हा अपघात नेमका कसा घडला त्यामागची कारणे तपासेल. सध्याची एसओपी आणि दिशा निर्देशांचा आढावा घेईल आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय पाऊले उचलावी लागतील याची शिफारस करतील. 

ड्रीमलायनरची चौकशी सुरू, ८ विमानांची तपासणी

दरम्यान, DCGA च्या निर्देशानंतर बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची चौकशी होणार आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलायनर आहेत ज्यातील ८ विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. ज्यातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे केवळ एकमेव प्रवासी या भीषण अपघातातून सुखरूप बचावला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज परिसरातील इमारतीला धडकले तिथल्या ४० हून अधिक जणांचा जीव गेल्याची भीती वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद