Air India Tata Group Statement, Plane Crash Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाअपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. विमान एका रुग्णालयावर कोसळल्याची माहिती दिली जात आहे. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. यादरम्यान, एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक संदेश जारी केले आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविक येथे जाणारे एअर इंडियाचे फ्लाईट AI171 याचा आज अपघात झाला. या वृत्ताची मी अत्यंत दुःखी मनाने पुष्टी करतो. या दुर्दैवी घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांसोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या आमचे प्राथमिक उद्देश सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हेच आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ते सर्व मदत करण्यासाठी आमच्या शक्तीनुसार सर्व प्रयत्न करत आहोत. अधिक तथ्ये आणि तपशीलवार माहिती मिळताच पुढील अपडेट्स शेअर केले जातील. अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र ( An emergency centre ) आणि मदत पथक ( support team ) स्थापन करण्यात आले आहे, असा संदेश एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिल्याचे टाटा ग्रुपच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.