शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:52 IST

तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर, विमानात तांत्रिक बिघाड असण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. यातच आता रविवारी संध्याकाळी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट 'फ्लाइटराडार२४'च्या माहितीनुसार, एअर इंडिया या विमान कंपनीचे एअरबस ए३२० प्रकारातील विमान क्रमांक एआय२४५५ दोन तासांहून अधिक काळ हवेतच घिरट्या घालत होते.

१० ऑगस्ट रोजी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एआय २४५५च्या कर्मचाऱ्यांना विमानात संशयास्पद तांत्रिक बिघाड जाणवला. याशिवाय खराब हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमान चेन्नईकडे वळवण्यात आले, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

विमानात होते ५ खासदारएअर इंडियाच्या या विमानात पाच खासदारांसह अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाने माहिती देताना सांगितले की, हे विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले. तिरुअनंतपुरमहून उड्डाण केलेल्या फ्लाइट क्रमांक एआय २४५५मध्ये केरळचे चार खासदार काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोडिकुनिल सुरेश आणि के. राधाकृष्णन, तामिळनाडूचे खासदार रॉबर्ट ब्रूस प्रवास करत होते. 

मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावलो!लँडिंगनंतर, वेणुगोपाल यांनी 'मोठ्या अपघातापासून थोडक्यात बचावलो' असे म्हटले. त्यांनी असा दावा केला की, विमानात रडारची समस्या होती, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंगपूर्वी आम्ही सुमारे एक तास १० मिनिटे हवेत होतो. ते म्हणाले की, मी या प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (DGCA) आधीच दिली आहे.

एअर इंडियाने दिले स्पष्टीकरणएअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले असून, आता त्याची आवश्यक तपासणी केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. 'फ्लाइटराडार२४'वरून मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने तिरुवनंतपुरमहून रात्री ८ नंतर उड्डाण केले आणि रात्री १०.३५ वाजता ते चेन्नईला पोहोचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाChennaiचेन्नई