शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:52 IST

तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर, विमानात तांत्रिक बिघाड असण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. यातच आता रविवारी संध्याकाळी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट 'फ्लाइटराडार२४'च्या माहितीनुसार, एअर इंडिया या विमान कंपनीचे एअरबस ए३२० प्रकारातील विमान क्रमांक एआय२४५५ दोन तासांहून अधिक काळ हवेतच घिरट्या घालत होते.

१० ऑगस्ट रोजी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एआय २४५५च्या कर्मचाऱ्यांना विमानात संशयास्पद तांत्रिक बिघाड जाणवला. याशिवाय खराब हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमान चेन्नईकडे वळवण्यात आले, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

विमानात होते ५ खासदारएअर इंडियाच्या या विमानात पाच खासदारांसह अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाने माहिती देताना सांगितले की, हे विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले. तिरुअनंतपुरमहून उड्डाण केलेल्या फ्लाइट क्रमांक एआय २४५५मध्ये केरळचे चार खासदार काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोडिकुनिल सुरेश आणि के. राधाकृष्णन, तामिळनाडूचे खासदार रॉबर्ट ब्रूस प्रवास करत होते. 

मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावलो!लँडिंगनंतर, वेणुगोपाल यांनी 'मोठ्या अपघातापासून थोडक्यात बचावलो' असे म्हटले. त्यांनी असा दावा केला की, विमानात रडारची समस्या होती, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंगपूर्वी आम्ही सुमारे एक तास १० मिनिटे हवेत होतो. ते म्हणाले की, मी या प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (DGCA) आधीच दिली आहे.

एअर इंडियाने दिले स्पष्टीकरणएअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले असून, आता त्याची आवश्यक तपासणी केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. 'फ्लाइटराडार२४'वरून मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने तिरुवनंतपुरमहून रात्री ८ नंतर उड्डाण केले आणि रात्री १०.३५ वाजता ते चेन्नईला पोहोचले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाChennaiचेन्नई