शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:22 IST

Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमागे लागलेलं संकटाचं शुक्लकाष्ट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, एअर इंडियाने शनिवारी या घटनेला दुजोरा दिला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान मुंबईत माघारी आणले, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमानातील केबिनमधून जळाल्याचा वास आल्यानंतर विमानाला माघारी आणण्यात आलं. तसेच हे विमान मुंबईमध्ये सुखरूपरीत्या उतरलं. त्यानंतर प्रवाशांच्या सोईसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. प्रवशांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, असेही एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

याचप्रमाणे शुक्रवारी एअर इंडियाच्या आणखी एका विमानामध्येही नॉन स्पेसिफिक सिक्युरिटी अलर्ट मिळाला होता. मात्र सुरक्षेच्या सर्व मापदंडांची पडताळणी केल्यानंतर त्या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

अन्य एका घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दिल्लीहून जम्मूला जात असलेल्या आयएक्स२५६४ या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर दिल्लीला माघारी आणावं लागलं होतं.  हे विमान सकाळी १०.४० वाजता उड्डाण करणार होतं. मात्र ते ११ वाजून ४ मिनिटांनी रवाना झालं. ते १२ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही वेळातच त्याला दिल्लीला माघारी आणण्यात आलं.  -----------------------------------------

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानMumbaiमुंबई