शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:22 IST

Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमागे लागलेलं संकटाचं शुक्लकाष्ट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, एअर इंडियाने शनिवारी या घटनेला दुजोरा दिला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान मुंबईत माघारी आणले, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमानातील केबिनमधून जळाल्याचा वास आल्यानंतर विमानाला माघारी आणण्यात आलं. तसेच हे विमान मुंबईमध्ये सुखरूपरीत्या उतरलं. त्यानंतर प्रवाशांच्या सोईसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. प्रवशांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, असेही एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

याचप्रमाणे शुक्रवारी एअर इंडियाच्या आणखी एका विमानामध्येही नॉन स्पेसिफिक सिक्युरिटी अलर्ट मिळाला होता. मात्र सुरक्षेच्या सर्व मापदंडांची पडताळणी केल्यानंतर त्या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

अन्य एका घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दिल्लीहून जम्मूला जात असलेल्या आयएक्स२५६४ या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर दिल्लीला माघारी आणावं लागलं होतं.  हे विमान सकाळी १०.४० वाजता उड्डाण करणार होतं. मात्र ते ११ वाजून ४ मिनिटांनी रवाना झालं. ते १२ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही वेळातच त्याला दिल्लीला माघारी आणण्यात आलं.  -----------------------------------------

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानMumbaiमुंबई