शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:18 IST

Operation Sindoor: पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर एआयएमआयएम नेते यांनी आक्रमक होत भूमिका स्पष्ट केली.

Operation Sindoor: पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केवळ भारताच्या पंतप्रधानांना नाही तर येथील सर्व लोकांना आव्हान दिले होते. आता पाकिस्तानने मसूद अझहरच्या नातेवाईकांचा धर्म विचारला पाहिजे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले. कारण भारतात हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा कट होता. त्यानंतर भारताने जी कारवाई केली, ती इतिहासात नोंदवली जाईल. पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून असलेले दहशतवादी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक होते. हा एक मैलाचा दगड ठरला आहे, असे कौतुकोद्गार एमआयएम नेते शोएब जमई यांनी काढले आहेत.

भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. भारताने चहुबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जमई आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ

या मुलाखतीत संताप व्यक्त करत जमई म्हणाले की, भारतातील मुस्लिमांना फक्त १५ मिनिटांसाठी सत्ता हाती द्यावी. पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे हे आम्ही दाखवून देऊ. भारतातील मुस्लिमांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला आहे. देशाच्या उभारणीत, जडणघडणीत आणि प्रगतीत आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे जमई यांनी सांगितले. तसेच भारतीय सीमांवर कोणी वाकड्या नजरने किंवा कोणतीही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, त्यांचा नाश करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जेव्हा भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, तेव्हा भारतातील मुस्लिम सर्वोच्च त्याग करून सीमांचे रक्षण करण्यास तयार असतात.

दरम्यान, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ऑपरेशन सिंदूर कारवाईचे कौतूक केले. एका सभेत ओवेसी यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ या घोषणा दिल्या. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये. तसेच या प्रसंगी आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देऊ. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानसाठी एक संदेश आहे, असे ओवेसी यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन