शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चार वर्षांमध्ये किती मुस्लिमांना सैन्यात सामावून घेतलं? ओवैसींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 17:35 IST

सैन्यातील मुस्लिमांची आकडेवारी जाहीर करण्याचं आव्हान

नवी दिल्ली: सैन्यात किती मुस्लिम आहेत?, असा वादग्रस्त प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. मोदींच्या कार्यकाळात लष्करी सेवेत किती मुस्लिमांना सामावून घेण्यात आलं, असा सवाल ओवैसी यांनी विचारला आहे. मोदींनी आपल्याला खोटं ठरवून दाखवावं, असं आव्हान देत भाजपा सरकारनं मुस्लिमांसाठी काहीच केलं नाही, असा आरोपदेखील त्यांनी केला. गेल्या चार वर्षांमध्ये किती मुस्लिमांना सीमा सुरक्षा दल, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात नोकऱ्या मिळाल्या?, असा प्रश्न ओवैसी यांनी एका जनसभेला संबोधित करताना उपस्थित केला. गेल्या चार वर्षांमध्ये संरक्षण दलांमध्ये किती मुस्लिमांना नोकऱ्या दिल्या, याची आकडेवारी सरकारनं आठवड्याभरात द्यावी, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. 'तुम्ही मुस्लिमांच्या एका हातात कॉम्प्युटर आणि एका हातात संगणक देण्याची भाषा करतात. मात्र नोकऱ्याच नाहीत. इंटरनेटवर काहीच दिसत नाहीत,' असं ओवैसी म्हणाले. 'सीआयएसएफमध्ये 3.7 टक्के, सीआरपीएफमध्ये 5.5 टक्के तर रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये 6.9 टक्के मुस्लिम असल्याची माहिती माझ्या एका भावानं मला दिली,' असंही त्यांनी म्हटलं. भाजपानं दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसवर 'मुस्लिमांचा पक्ष' अशी टीका केली होती. यावरुन काँग्रेस आणि भाजपावरुन जुंपली असताना आता या वादात ओवैसींनीही उडी घेतली. 'हे दोन्ही पक्ष मुस्लिमांना काय संदेश देऊ पाहत आहेत? मुस्लिम हा शब्द खराब आहे का?' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानBJPभाजपाMuslimमुस्लीमcongressकाँग्रेस