एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:16 IST2025-06-13T13:15:46+5:302025-06-13T13:16:55+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash: अहमदाबाद येथील विमान अपघातामागील संभाव्य कारणांसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी, अपघाताचे नेमके कारण पुढे येण्यासाठी किमान सहा महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
नवी दिल्ली : अहमदाबाद येथील विमान अपघातामागील संभाव्य कारणांसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी, अपघाताचे नेमके कारण पुढे येण्यासाठी किमान सहा महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विमान अपघातांची चौकशी करण्याच्या नागरी विमान उड्डयन महासंचालनालय (डीजीसीए) आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डयन संघटना (आयसीएओ)च्या स्थापित प्रक्रियेनुसार प्रारंभिक अहवालास ३० दिवसांचा, तर अंतिम अहवालास सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो.
अपघातग्रस्त विमानाचे निरीक्षण व पुन्हा जुळवणे
अपघातग्रस्त विमानाचे तुकडे जमा करून, त्यावरून अपघाताची शृंखला उलगडली जाते.
तपासले जाणारे भाग : लँडिंग गिअर
हायड्रॉलिक व इलेक्ट्रिकल प्रणाली
फ्लाईट कंट्रोल सर्फेस
बाह्य घटकांचा परिणाम (उदा. पक्ष्याची धडक)
ब्लॅक बॉक्सची पुनर्प्राप्ती व विश्लेषण केले जाणार आहे.