शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:18 IST

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकीकडे इंडिया आघाडी भाजपाविरोधात मजबूत होताना दिसतेय तर दुसरीकडे भाजपाप्रणित एनडीएतून एक एक पक्ष बाहेर पडताना दिसत आहेत. आता अभिनेता आणि नेता पवन कल्याणने गुरुवारी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएतून बाहेर पडत टीडीपीचे समर्थन करण्याची घोषणा केली. आंधप्रदेशच्या विकासासाठी जनसेना आणि टीडीपी गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं.

जनसेना प्रमुख पवन कल्याण म्हणाले की, टीडीपी एक मजबूत पक्ष आहे. आंध्र प्रदेशच्या सुशासन आणि विकासासाठी तेलुगु देशम पार्टीची गरज आहे. आज टीडीपी संघर्ष करत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या काळात टीडीपीला जनसैनिकांच्या युवकांची गरज आहे. जर टीडीपी आणि जनसेना एकत्र आली तर राज्यात वाएसआरसीपीची सरकार कोसळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण आंध्र प्रदेशातील वायएसआर जगमोहन रेड्डी यांच्या सरकारवर नाराज आहेत. जनसेना प्रमुख पवन कल्याण १४ सप्टेंबरला चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी राजामुंडरीच्या सेंट्रल जेलला गेले होते. त्यानंतर १८ सप्टेंबरला दिल्लीत आयोजित NDA च्या बैठकीत पवन कल्याण सहभागी झाले होते. आम्ही भाजपाचे समर्थन करू असं त्या बैठकीनंतर पवन कल्याण यांनी म्हटलं होते. ते म्हणाले होते की, एनडीएची बैठक खूप चांगली झाली. या बैठकीत आत्मनिर्भर भारत यावर चर्चा झाली. आमच्या पक्षाकडून मी पंतप्रधान मोदींना आश्वासन दिले की आम्ही तुमच्यासोबत उभे राहू असं त्यांनी सांगितले होते.

पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशात वायएसआरसीपी सरकारविरोधात लढण्यासाठी स्वत:चा पक्ष, एनडीए आणि टीडीपी यांना एकत्रित राहण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु आता पवन कल्याण यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला ५.६ टक्के मतदानासह १ जागेवर विजय मिळवण्यास यश आले होते. तर टीडीपीला ३९.७ टक्के मतांसह २३ जागा मिळाल्या होत्या. तर वायएसआरसीपी ५०.६ टक्के मतदान मिळून १५१ जागा जिंकत सरकार स्थापन केले होते.

दरम्यान, अलीकडेच AIADMK यांनी भाजपाशी नाते तोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम्ही वेगळी आघाडी करू असं AIADMK प्रमुखांनी म्हटलं होते. २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष आपापली रणनीती तयार करत आहेत. त्यात भाजपाविरोधी २८ पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडीच्या बैठका पाहता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू