शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

Agriculture : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती, उष्णतेची लाट पिकांवर परिणाम करू शकते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:39 IST

Heat Wave : उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे.

नवी दिल्ली : साधारणत: मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा  (Heat Wave) परिणाम सध्या दिसून येत आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसने वाढला असून, त्यामुळे देशभरात उष्णतेची लाट (Summer 2022) पसरली आहे.

उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. उच्च तापमानाचा रब्बी पिकांच्या (Rabi Crops) उत्पन्नावर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काढणीसाठी तयार असलेल्या पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 

यावेळी, देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर तापमानात अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत यंदा उष्णतेच्या लाटेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. 

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटचा अंदाज आहे की, राजस्थानच्या पश्चिम भागावर  प्रतिचक्रवात अस्तित्वात आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. येत्या 24 तासांत तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक भागांतून उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असल्याचे एजन्सीचे मत आहे.

दुसरीकडे, कृषी तज्ज्ञांनीही उष्ण हवामानाबाबत आपल्या अंदाजात म्हटले आहे की, उच्च तापमान एक-दोन आठवडे कायम राहिल्यास उत्तर भारतातील पिकांवर (North India) त्याचा वाईट परिणाम होईल. या हवामानाचा पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याचबरोबर, तीव्र उष्णतेमुळे गडगडाटी वादळे, गारपीट किंवा धुळीचे वादळ यासारख्या तीव्र मान्सूनपूर्व घडामोडी घडू शकतात. या घडामोडींमुळे कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचेही नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातFarmerशेतकरीagricultureशेती