शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:32 IST

Agniveer Murali Naik : अग्निवीर मुरली नाईक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर (LoC) शौर्य दाखवून देशासाठी आपलं बलिदान दिलं.

अग्निवीर मुरली नाईक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर (LoC) शौर्य दाखवून देशासाठी आपलं बलिदान दिलं. ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात मुरली नाईक यांनी आपला जीव गमावला. आज त्यांचं पार्थिव आंध्र प्रदेशातील गोरंटला मंडलमधील त्यांच्या कल्लिथंडा गावात पोहोचलं. 

लहानपणापासूनच पाहिलेलं देशसेवा करण्याचं स्वप्न  

८ एप्रिल २००२ रोजी जन्मलेले अग्निवीर मुरली नाईक यांनी लहानपणापासूनच देशसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. डिसेंबर २०२२ मध्ये, वयाच्या २० व्या वर्षी, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात सामील होऊन त्यांनी आपलं स्वप्न साकार केलं. नाशिकमध्ये ६ महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, त्यांनी आसाममध्ये १ वर्ष सेवा बजावली आणि सध्या त्यांची पोस्टिंग पंजाबमध्ये होती.

पालकांशी फोनवर साधलेला संवाद

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या मुरली यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पालकांशी फोनवर संवाद साधला होता, ज्यामध्ये त्यांनी युद्धात सहभागी होण्याबद्दल सांगितलं होतं. त्यांची देशभक्ती आणि सैन्याप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांना स्पेशल ऑपरेशन्स फोकस कॅडर (AV-OPR) मध्ये स्थान मिळालं.

मुरली नाईक हे त्यांचे आईवडील श्रीरामुलु नाईक आणि ज्योतीबाई यांचे एकुलते एक पुत्र होते. २०१६-१७ मध्ये समंडेपल्ली येथून दहावी उत्तीर्ण झाले. मुरली यांनी त्यांच्या पालकांना सांगितलं होतं की, ते ४ वर्षांची सेवा पूर्ण करून २०२६ मध्ये घरी परत येतील, परंतु त्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं. जर शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात गुंडाळलं जावं अशी त्यांची इच्छा होती. मुरली नाईक यांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. 

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन." 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान