शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:32 IST

Agniveer Murali Naik : अग्निवीर मुरली नाईक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर (LoC) शौर्य दाखवून देशासाठी आपलं बलिदान दिलं.

अग्निवीर मुरली नाईक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर (LoC) शौर्य दाखवून देशासाठी आपलं बलिदान दिलं. ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात मुरली नाईक यांनी आपला जीव गमावला. आज त्यांचं पार्थिव आंध्र प्रदेशातील गोरंटला मंडलमधील त्यांच्या कल्लिथंडा गावात पोहोचलं. 

लहानपणापासूनच पाहिलेलं देशसेवा करण्याचं स्वप्न  

८ एप्रिल २००२ रोजी जन्मलेले अग्निवीर मुरली नाईक यांनी लहानपणापासूनच देशसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. डिसेंबर २०२२ मध्ये, वयाच्या २० व्या वर्षी, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात सामील होऊन त्यांनी आपलं स्वप्न साकार केलं. नाशिकमध्ये ६ महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, त्यांनी आसाममध्ये १ वर्ष सेवा बजावली आणि सध्या त्यांची पोस्टिंग पंजाबमध्ये होती.

पालकांशी फोनवर साधलेला संवाद

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या मुरली यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पालकांशी फोनवर संवाद साधला होता, ज्यामध्ये त्यांनी युद्धात सहभागी होण्याबद्दल सांगितलं होतं. त्यांची देशभक्ती आणि सैन्याप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांना स्पेशल ऑपरेशन्स फोकस कॅडर (AV-OPR) मध्ये स्थान मिळालं.

मुरली नाईक हे त्यांचे आईवडील श्रीरामुलु नाईक आणि ज्योतीबाई यांचे एकुलते एक पुत्र होते. २०१६-१७ मध्ये समंडेपल्ली येथून दहावी उत्तीर्ण झाले. मुरली यांनी त्यांच्या पालकांना सांगितलं होतं की, ते ४ वर्षांची सेवा पूर्ण करून २०२६ मध्ये घरी परत येतील, परंतु त्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं. जर शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात गुंडाळलं जावं अशी त्यांची इच्छा होती. मुरली नाईक यांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. 

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन." 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान