शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Agneeveer Yojana: वाद सुरू असतानाच 'या' काँग्रेस नेत्यानं केलं अग्निपथ योजनेचं कौतुक, सांगितलं का आवश्यक आहे ही योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 22:32 IST

मोदी सरकारच्या या योजनेला देशातील अनेक भागांतून विरोध होत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस पक्षानेही सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे कौतुक केले आहे. हे एक योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, आजच्या काळात आपल्याला एका मोबाईल आर्मीची आणि एका युथ आर्मीची आवश्यकता आहे. आपल्याला तंत्रज्ञान आणि शस्त्रांवर अधिक खर्च करावा लागेल आणि जोवर आपले सैन्य मोठे होत नाही, तोवर हे होणार नाही. यासाठीच सर्वाधिक पैसा खर्च होतो.

मोदी सरकारच्या या योजनेला देशातील अनेक भागांतून विरोध होत आहे. असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेस पक्षानेही सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. ही सुरक्षा दलांशी तडजोड असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका मांडत, गेल्या दशकांमध्ये युद्धाच्या स्वरूपातील बदल ही एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

तिवारी म्हणाले, "जर आपण सुरक्षा दलांकडे तीन दशके मागे जाऊन बघितले, तर आपल्याला मोबाईल अभियान दलाची आवश्यकता आहे, जे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत आणि तरुण देखील आहेत. यामुळे, त्या स्थितीत ही एक अत्यंत आवश्यक सुधारणा आहे.'' याच बरोबर, आपल्या आवडो वा न आवडो, पण वन रँक वन पेन्शन योजनेमुळे वाढणारे पेन्शन बिल, सरकारच्या हिशोबात गेलेच असेल, असेही तिवारी म्हणाले.

या योजनेमुळे देशभरातील तरुणांमध्ये नाराजी दिसून येत आहे, हे मान्य करत तिवारी म्हणाले, केंद्रीय सुरक्षा दल म्हणजे काही रोजगार हमी कार्यक्रम नाही. मात्र, तरीही सरकारने वर्तमान परिस्थितीनुसार, नियोजन करायला हवे. जेणेकरून अग्निवीरांची चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलांत रोजगाराच्या संधी मिळू शकतील. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान