शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सीबीआयसारख्या यंत्रणा किरकोळ गोष्टीत अडकल्या, धोकादायक गुन्ह्यांवर लक्ष द्या : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 07:42 IST

Supreme Court: सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

नवी दिल्ली - सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

छाप्यांदरम्यान वैयक्तिक अनावश्यक जप्तीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, चंद्रचूड म्हणाले की, ते तपासात्मक अत्यावश्यकता आणि वैयक्तिक गोपनीयतेचे अधिकार यांच्यातील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतात.

यंत्रणांनी काय करावे?- आमच्यासाठी केवळ न्यायालये सुव्यवस्थित करणे नव्हे तर सीबीआय आणि तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. - आम्ही कदाचित तपास यंत्रणांचा वापर किरकोळ गोष्टींसाठी केला. यंत्रणांनी त्यांचे लक्ष व प्रयत्न त्या गुन्ह्याच्या वर्गावर केंद्रित केले पाहिजेत, जे खरोखरच देशाची सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करतात,” असे सरन्यायाधीश म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग