शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 7:20 PM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली -   लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून  पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धावा घेण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. या बैठकीमध्ये सहा विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  दरम्यान, विरोधी पक्षांची ही बैठक म्हणजे निवडणूक संपण्यापूर्वीच पारभव पत्करल्याचे उदाहरण असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.या बैठकीनंतर टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान चार हजारांहून अधिक इव्हीएम खराब झाल्या होत्या, असा आरोप नायडू यांनी केला.  ''आम्ही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोता. जगाच्या पाठीवर ईव्हीएमचा वापर करणारे खूपच कमी देश आहेत. जर आम्हाला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर मतपत्रिकेव्दारे मतदान घेतले पाहिजे,'' असे नायडू यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत आहे, असे वाटत नाही.जर तुम्ही एक्स पार्टीला मत दिले तर मत वाय पार्टीला जात आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशीनमधून येणारी चिठ्ठीसुद्धा 7 सेकंदांऐवजी तीन सेकंदच दिसत आहे,असा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय