शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बँकेच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, प्रियंका म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:31 IST

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते.

मुंबई - येस बँकेतील व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्थगिती आणली आहे. ग्राहकांना त्यांच्या येस बँकेतील खात्यातून येत्या ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या बँकेशी व्यवहार करणाऱ्या हजारो खातेदारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांना बँकांचा फटका सातत्याने बसत असल्याने, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

येस बँकेचे ग्राहक असलेल्या नागरिकांना 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढता येऊ शकत नाही. बँकेच्या निर्बंधामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. येस बँकेच्या डबघाईनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन सर्वसामान्य नागरिकांचं दु:ख मांडताना, बँकांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते. उत्तर प्रदेशमधील या शेतकऱ्याने बँकेसमोरच आपली जीवनयात्रा संपवली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे, लहान व कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही बँकेकडून त्रास दिला जातोय, असे प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. तसेच, भाजपा सरकारकडून खोट्या कर्जमाफीचा ढोल वाजविण्यात येत आहे. आता, या कुटुंबासाठी भाजपाकडे काय उत्तर आहे? असा प्रश्नही प्रियंका गांधींनी विचारला आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर देशातील बँकांच्या परिस्थितीवर प्रियंका यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे धनदांडगे लोकं, उद्योजक बँकांना लुबाडत आहेत. तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना बँकांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय, हेच प्रियंका यांनी सूचवलंय. 

   

दरम्यान, येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे ३० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास  कपूर यांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yes Bankयेस बँकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या