शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, प्रियंका म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:31 IST

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते.

मुंबई - येस बँकेतील व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्थगिती आणली आहे. ग्राहकांना त्यांच्या येस बँकेतील खात्यातून येत्या ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या बँकेशी व्यवहार करणाऱ्या हजारो खातेदारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांना बँकांचा फटका सातत्याने बसत असल्याने, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

येस बँकेचे ग्राहक असलेल्या नागरिकांना 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम काढता येऊ शकत नाही. बँकेच्या निर्बंधामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. येस बँकेच्या डबघाईनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विट करुन सर्वसामान्य नागरिकांचं दु:ख मांडताना, बँकांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सहारनपूर येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे केवळ 1 लाख 40 हजार रुपयांचं बँकेचं कर्ज या शेतकऱ्याकडे होते. उत्तर प्रदेशमधील या शेतकऱ्याने बँकेसमोरच आपली जीवनयात्रा संपवली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे, लहान व कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही बँकेकडून त्रास दिला जातोय, असे प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. तसेच, भाजपा सरकारकडून खोट्या कर्जमाफीचा ढोल वाजविण्यात येत आहे. आता, या कुटुंबासाठी भाजपाकडे काय उत्तर आहे? असा प्रश्नही प्रियंका गांधींनी विचारला आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर देशातील बँकांच्या परिस्थितीवर प्रियंका यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे धनदांडगे लोकं, उद्योजक बँकांना लुबाडत आहेत. तर, दुसरीकडे सर्वसामान्य माणसांना बँकांकडून मोठा त्रास सहन करावा लागतोय, हेच प्रियंका यांनी सूचवलंय. 

   

दरम्यान, येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे ३० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास  कपूर यांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Yes Bankयेस बँकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या